शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

गेवराईतही प्रतिसाद ‘जेल भरो’ने जिल्हा दणाणला

By admin | Updated: September 15, 2015 00:30 IST

बीड : राज्यात दुष्काळी जाहीर करा, तातडीच्या उपाययोजना करा या प्रमुख मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करुन जेलभरो आंदोलन केले

बीड : राज्यात दुष्काळी जाहीर करा, तातडीच्या उपाययोजना करा या प्रमुख मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करुन जेलभरो आंदोलन केले. यावेळी प्रमुख नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करुन लगेचच सुटका केली. शहरातील शिवाजी चौकात तब्बल तीन तास रास्ता रोको झाला. त्यामुळे महामार्ग ठप्प झाला होता. सर्वत्र आंदोलन शांततेच्या मार्गाने झाले.दुष्काळी स्थितीत सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जात असून उपाययोजनांकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जेलभरो आंदोलनाची हाक दिली होती. जिल्ह्यात आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचे सूचविले होते. त्यानुसार क्षीरसागरांनी वडवणी, मांजरसुंबा, घाटसावळी, बीड, रायमोहा येथील आंदोलनांमध्ये सहभाग नोंदविला.छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कार्यकर्त्यांनी चारही रस्ते रोखून धरली.बैलगाड्यांसह काही शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नेतृत्व केले. माजी आ. राजेंद्र जगताप, उषा दराडे, सय्यद सलीम, डॉ. योगेश क्षीरसागर, अ‍ॅड. सुभाष राऊत, अमर नाईकवाडे, महेश धांडे, प्रिया डोईफोडे, विनोद इंगोले, मोईन मास्टर आदी सहभागी होते. घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी आ. क्षीरसागर यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, अच्छे दिनच्या नावाखाली मोदी सरकारने सामान्यांची मते घेऊन सत्ता मिळवली;परंतु शेतकरी अडचणीत असताना त्यांना मदत करण्याची भावना नाही. पाणी, चारा नाही. रोज एक शेतकरी मृत्यूला कवटाळतो आहे. मात्र, सत्ताधारी झोपेचे सोंग घेत आहेत. मोदी मते मागायला आले; परंतु आता मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना ते फिरकलेही नाही, असा टोलाही त्यांनी मारला. यावेळी राकॉ जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीला फक्त राष्ट्रवादी पक्ष धावून आलेला आहे. महाराष्ट्रात दुष्काळ गंभीर स्वरुप धारण करत असताना पंतप्रधान, मुख्यमंत्री परदेशवाऱ्यात दंग आहेत. आघाडी सरकारने ७३ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. या सरकारने बिहारला मदतीची घोषणा केली;परंतु शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही असा चिमटाही काढला. सत्ताधारी उद्योगपतींचे हित जोपासत आहे, शेतकऱ्यांबाबत त्यांना कुठलीही दया नाही असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी गुन्हे नोंद झाले, जेलमध्ये जावे लागले तरी चिंता नाही असे स्पष्ट केले. आंदोलनस्थळीच तात्पुरते जेलकन्या शाळेत पोलिसांनी तात्पुरत्या जेलची उभारणी केली होती. आंदोलनकर्त्यांना अटक करुन या जेलमध्ये काही वेळ ठेवले होते. पाच हजारावर कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले. (प्रतिनिधी)तालुक्यातील उमापूर फाटा येथे आ. अमरसिंह पंडित, भेंडटाकळी फाटा येथे जि.प. अध्यक्ष विजयसंह पंडित व शहरात माजी आमदार बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन झाले. जि.प.सदस्य युधाजित पंडित, पंढरीनाथ लगड, शेख खाजा, राजेंद्र भंडारी, भाऊसाहेब नाटकर , आप्पासाहेब गव्हाणे, कुमार ढाकणे, विलास चव्हाण, दिगांबर येवले, मदनराव घाडगे आदी उपस्थित होते. हजारो कायकर्त्यांना अटक झाली.जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दुष्काळी मोर्चा काढला होता. जेल भरोच्या निमित्ताने त्यांनी सर्व तालुक्यांत बैठका घेऊन नियोजन केले होते. त्यांच्या हाकेला जिल्ह्यातील राकॉचे सर्व नेते धावून आले. त्यामुळे सर्वच भागांत मोठा प्रतिसाद लाभला. आ. जयदत्त क्षीरसागर यांच्यासह इतर नेत्यांनी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नियोजनाचा आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.