शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

शेतकरी संपाला प्रतिसाद

By admin | Updated: June 2, 2017 00:40 IST

जालना : भाजीपाला, दूध विक्री थांबवून जिल्ह्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजीपाला, दूध विक्री थांबवून जिल्ह्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. जालना तालुक्यातील रोहनवाडी, रेवगाव, कुंबेफळ, इंदेवाडी, बाजीउम्रद, काजळा आदी गावच्या शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध विक्री न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, जालना मोंढ्यात सकाळी भाजीपाला विक्रीसाठी आला. परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध दर्शविला.शहराच्या परिसरात असलेल्या गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. तसेच याच गावांतून शहरामध्ये दूध विक्रीस जाते. दूरवरच्या गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन न घेता शेतकरी अन्य पीक उत्पादनाकडे वळलेले असल्याने तेथून भाजीपाला विक्रीसाठी जात नाही. शहरालगतच्या अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. जालना शहर परिसरातील रोहनवाडी, इंदेवाडी, बेथलम, रेवगाव, कुंबेफळ, राममूर्ती, देवमूर्ती आदी गावांतून जालना मोंढ्यात भाजीपाला विक्रीस येतो. शेतकरी संपाचा गुरुवारी पहिला दिवस असल्याने काही काही जणांनी खरबूज विक्रीसाठी मोंढ्यात आणले. परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. संतप्त कार्यकर्त्यांनी वाहनातून खरबूज काढून रस्त्यावर फेकणे सुरु केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्या दिवशी संपाची तीव्रता फारशी जाणवली नसली तरी उद्यापासून शेतकरी पूर्णत: संपात उतरतील, असा दावा शेतकरी संघटनेचे बबनराव गवारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.तालुक्यातील रोहनवाडी येथील महिला बचत गटाने सुरु अरुनिमा गाय दूध गट ही दूध डेअरी बंद ठेवलीे. तर भाजीपाला उत्पादनक शेतकरी सुभाषराव तनपुरे, शंकर तनपुरे, उदयभान तनपुरे, रामकिसन मैंद, दत्ता गजर, नामदेव तनपुरे, बंडू तनपुरे हे संपात सहभागी झाल्याची माहिती बाळासाहेब तनपुरे यांनी दिली. काजळा येथे सकाळी भाजीविक्रीसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांनी गावातच रोखले. आजपासून कोणीही भाजीपाला तोडणार किंवा विक्रीसाठी न्यायचा नाही, असा निर्णय येथील शेतकऱ्यांनी घेतला. काजळा येथे जवळपास २०० लिटर दूध उत्पादन आहे. परंतु ते शहरात जात नाही, अशी माहिती संजय शेंडगे यांनी दिली. या संपात सहभागी होण्याचे आवाहन शेंडगे यांच्यासह विशाल मदनुरे, शिवाजी शिंदे, लक्ष्मण पघळ, भरत खोटे, शिवाजी वाल्हुरे, प्रल्हाद पडूळ यांनी केले आहे. काजळा येथे वांगी, शेपुची भाजी, कोबी, पालक, मेथी, हिरवी मिरची अशा प्रकारचा ८ ते ९ पोते भाजीपाला उत्पादीत होतो. गुरुवारी सकाळी विक्रीसाठी जाणारा हा भाजीपाला गावातच थांबविण्यात आला. त्यासोबत वांग्याचे १४ कॅरेटही होते, असे शेंडगे यांनी सांगितले.कुंबेफळ (ता.जालना) येथील ज्येष्ठ शेतकरी नेते बबनराव गवारे सांगितले की, शेतकऱ्यांमध्ये तीव्र आक्रोश आहे. शेतकरी संपाला गावातून प्रतिसाद मिळत आहे. गावातून शहरात विक्रीसाठी जाणारा भाजीपाला थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण कर्जमाफी अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील मच्ंिछद्र मदन यांनी कोबी विक्री थांबवून शेतकरी संपात सहभाग घेतला. अन्य शेतकरीही संपात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. जालना तालुक्यातील बाजीउम्रद, ब्राह्मणखेडा येथेही शेतकरी संपाबाबत आवाहन करण्यात आल्याचे गौरव पडूळ यांनी सांगितले.बदनापूर शहरात शेतकरी संघटना, शिवसेना व शेतकऱ्यांनी संपात सहभाग नोंदवित ५० लिटर दूध रस्त्यावर सांडवून दिले. या आंदोलनात देवजी जऱ्हाड, बाबासाहेब पवार, अंबादास कोळसकर, आसाराम शेळके, उद्धव खैरे, गणेश सिरसाठ, गणेश जऱ्हाड सहभागी झाले होते.अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काही राजकीय पक्षांनी एकत्र येत रास्ता रोको केला. यावेळी संपूर्ण कर्जमुक्ती, डॉ स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा, शेतमालास उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा आधारित दीडपट हमीभाव देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी के. एल. तांबोळी यांना देण्यात आले. आंदोलनात सुरेश काळे, बापूराव खटके, श्रीमंत खटके, पंडित गावडे, किरण तारख, बाबासाहेब गावडे, पांडुरंग उढाण, बंडूभाऊ मैद, पंढरीनाथ खटके, जगन खटके, दत्तात्रय खैरे, राधकीसन पवार सुभाष भोईटे आदी उपस्थित होते.