शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

शेतकरी संपाला प्रतिसाद

By admin | Updated: June 2, 2017 00:40 IST

जालना : भाजीपाला, दूध विक्री थांबवून जिल्ह्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजीपाला, दूध विक्री थांबवून जिल्ह्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. जालना तालुक्यातील रोहनवाडी, रेवगाव, कुंबेफळ, इंदेवाडी, बाजीउम्रद, काजळा आदी गावच्या शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध विक्री न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, जालना मोंढ्यात सकाळी भाजीपाला विक्रीसाठी आला. परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध दर्शविला.शहराच्या परिसरात असलेल्या गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. तसेच याच गावांतून शहरामध्ये दूध विक्रीस जाते. दूरवरच्या गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन न घेता शेतकरी अन्य पीक उत्पादनाकडे वळलेले असल्याने तेथून भाजीपाला विक्रीसाठी जात नाही. शहरालगतच्या अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. जालना शहर परिसरातील रोहनवाडी, इंदेवाडी, बेथलम, रेवगाव, कुंबेफळ, राममूर्ती, देवमूर्ती आदी गावांतून जालना मोंढ्यात भाजीपाला विक्रीस येतो. शेतकरी संपाचा गुरुवारी पहिला दिवस असल्याने काही काही जणांनी खरबूज विक्रीसाठी मोंढ्यात आणले. परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. संतप्त कार्यकर्त्यांनी वाहनातून खरबूज काढून रस्त्यावर फेकणे सुरु केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्या दिवशी संपाची तीव्रता फारशी जाणवली नसली तरी उद्यापासून शेतकरी पूर्णत: संपात उतरतील, असा दावा शेतकरी संघटनेचे बबनराव गवारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.तालुक्यातील रोहनवाडी येथील महिला बचत गटाने सुरु अरुनिमा गाय दूध गट ही दूध डेअरी बंद ठेवलीे. तर भाजीपाला उत्पादनक शेतकरी सुभाषराव तनपुरे, शंकर तनपुरे, उदयभान तनपुरे, रामकिसन मैंद, दत्ता गजर, नामदेव तनपुरे, बंडू तनपुरे हे संपात सहभागी झाल्याची माहिती बाळासाहेब तनपुरे यांनी दिली. काजळा येथे सकाळी भाजीविक्रीसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांनी गावातच रोखले. आजपासून कोणीही भाजीपाला तोडणार किंवा विक्रीसाठी न्यायचा नाही, असा निर्णय येथील शेतकऱ्यांनी घेतला. काजळा येथे जवळपास २०० लिटर दूध उत्पादन आहे. परंतु ते शहरात जात नाही, अशी माहिती संजय शेंडगे यांनी दिली. या संपात सहभागी होण्याचे आवाहन शेंडगे यांच्यासह विशाल मदनुरे, शिवाजी शिंदे, लक्ष्मण पघळ, भरत खोटे, शिवाजी वाल्हुरे, प्रल्हाद पडूळ यांनी केले आहे. काजळा येथे वांगी, शेपुची भाजी, कोबी, पालक, मेथी, हिरवी मिरची अशा प्रकारचा ८ ते ९ पोते भाजीपाला उत्पादीत होतो. गुरुवारी सकाळी विक्रीसाठी जाणारा हा भाजीपाला गावातच थांबविण्यात आला. त्यासोबत वांग्याचे १४ कॅरेटही होते, असे शेंडगे यांनी सांगितले.कुंबेफळ (ता.जालना) येथील ज्येष्ठ शेतकरी नेते बबनराव गवारे सांगितले की, शेतकऱ्यांमध्ये तीव्र आक्रोश आहे. शेतकरी संपाला गावातून प्रतिसाद मिळत आहे. गावातून शहरात विक्रीसाठी जाणारा भाजीपाला थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण कर्जमाफी अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील मच्ंिछद्र मदन यांनी कोबी विक्री थांबवून शेतकरी संपात सहभाग घेतला. अन्य शेतकरीही संपात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. जालना तालुक्यातील बाजीउम्रद, ब्राह्मणखेडा येथेही शेतकरी संपाबाबत आवाहन करण्यात आल्याचे गौरव पडूळ यांनी सांगितले.बदनापूर शहरात शेतकरी संघटना, शिवसेना व शेतकऱ्यांनी संपात सहभाग नोंदवित ५० लिटर दूध रस्त्यावर सांडवून दिले. या आंदोलनात देवजी जऱ्हाड, बाबासाहेब पवार, अंबादास कोळसकर, आसाराम शेळके, उद्धव खैरे, गणेश सिरसाठ, गणेश जऱ्हाड सहभागी झाले होते.अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काही राजकीय पक्षांनी एकत्र येत रास्ता रोको केला. यावेळी संपूर्ण कर्जमुक्ती, डॉ स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा, शेतमालास उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा आधारित दीडपट हमीभाव देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी के. एल. तांबोळी यांना देण्यात आले. आंदोलनात सुरेश काळे, बापूराव खटके, श्रीमंत खटके, पंडित गावडे, किरण तारख, बाबासाहेब गावडे, पांडुरंग उढाण, बंडूभाऊ मैद, पंढरीनाथ खटके, जगन खटके, दत्तात्रय खैरे, राधकीसन पवार सुभाष भोईटे आदी उपस्थित होते.