शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांचा आदर करणे हीच खरी सहिष्णुता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:05 IST

औरंगाबाद : दुसऱ्या धर्माची हेटाळणी करणे किंवा त्या धर्मातील श्रद्धांना ठेच पोहोचवणे म्हणजे धर्मनिरपेक्ष आहोत, असा अर्थ काढणे चुकीचे ...

औरंगाबाद : दुसऱ्या धर्माची हेटाळणी करणे किंवा त्या धर्मातील श्रद्धांना ठेच पोहोचवणे म्हणजे धर्मनिरपेक्ष आहोत, असा अर्थ काढणे चुकीचे असून सर्वांचा आदर करणे हीच खरी सहिष्णुता आहे, असे मत राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले. लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे प्रत्येक रविवारी आयोजित केल्या जाणाऱ्या ऑनलाइन संवादमालेत राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी ‘भारतीय राजकारणाची बदलती विषयपत्रिका : सहिष्णुता’ या विषयावर भूमिका मांडली.

डॉ. पवार म्हणाले, देशात मागील काही दिवसांपूर्वी दोन लाटा आल्या. यात कोरोनाची एक लाट आणि दुसरी लाट ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची होती. ज्या पद्धतीने कोरोनाची लाट थोपविण्यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न केले, त्यात सहिष्णुतेचा पूर्णपणे अभाव असल्याचे दिसून आले. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनात पूर्णपणे सहिष्णुता असल्याचे दिसून आले. कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा तिरस्कार नव्हता. प्रत्येकाचा आदर या आंदोलनाच्या वेळी केल्याचेही देशाने पाहिले.

सन २०१९ मध्ये केंद्रातील सरकारला पहिल्यापेक्षा अधिक बहुमत मिळाले होते. त्याचवेळी राज्याराज्यांमध्ये झालेले सत्ताबदल, मतदान यातून सहिष्णुतेला अधिक प्राधान्य मिळाल्याचे समोर आले. त्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत ओडिशा, हरियाणा, महाराष्ट्रात भाजपला सत्ता दिलेली नव्हती. महाराष्ट्रात युतीला बहुमत मिळालेले असताना सत्तेचे समीकरण बदलले. यावर्षी बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू राज्यात भाजपाला जोरदार हादरा बसला. राज्याराज्यांमधील सत्तेसाठी जनतेने सहिष्णुतेला प्राधान्य दिल्याची उदारहणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे देशपातळीवर सहिष्णुतेची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्याशिवाय पर्याय निर्माण होणार नाही, असे पवार म्हणाले.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे, सचिव डॉ. गणेश मोहिते, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. राम चव्हाण, प्रा. बंडू सोमवंशी, डॉ. कैलाश अंभोरे आदी उपस्थित होते.