शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

राणी उंचेगावात पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: May 7, 2014 23:56 IST

गणेश लोंढे , राणीउंचेगाव घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

गणेश लोंढे , राणीउंचेगाव घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना महिना दीड महिन्यांपासून भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील राणीउंचेगाव हे मोठे गाव आहे. लोकसंख्याही चार हजारांच्या वर आहे. मात्र शासनाच्या नियोजनाअभावी ग्रामस्थांना हाल सोसावे लागत आहेत. गावात पाण्याची सोय व्हावी म्हणून पाच किमी लांबीच्या जलवाहिनीद्वारे १ कोटी ११ लाख रुपये खर्च करुन भारत निर्माण योजनेचे काम करण्यात आले आहे. योजना पूर्ण झाल्यावर पाणीटंचाई संपेल अशी ग्रामस्थांना आशा होती. तीही आतामावळली आहे. २००९ पासून टंचाई कमी होण्याऐवजी सातत्याने वाढतच आहे. विहिरीवरुन जलवाहिनीद्वारे गावात पाणी आणण्यात आले आहे; परंतु ग्रामपंचायतीचे नियोजन कोलमडले आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांची भागम्भाम सकाळपासूनच सुरू असते. जलवाहिनीसोबतच हातपंपही आहे. नियमित देखभाल नसल्यामुळे ९ हातपंप बंद आहेत. पंचायत समितीने हे हातपंप तात्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. कडक उन्हाळ्यातही ग्रामपंचायत पाणीटंचाईचे नियोजन करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. इंदिरानगर भागातील रहिवाशांना बारमाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांना टँकरसाठी दररोज पैसे मोजावे लागत आहेत. ठराविक भागांमध्ये मुबलक पाणी गावातील काही ठराविक वस्त्या तसेच भागांमध्ये मुबलक पाणीपुरवठा करण्यात येतो. इतर भागातील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. असा भेदभाव केला जातो? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. ग्रामविकास अधिकारी सूर्यवंशी म्हणाले,गावातील ज्या भागामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे, अशा भागामध्ये पाणी सोडण्यासाठी वेगळ्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.