शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

वसाहतींवरील आरक्षण उठवणार

By admin | Updated: January 3, 2016 00:01 IST

औरंगाबाद : सुधारित विकास आराखड्यात काही ठिकाणी नागरी वसाहतींवर आरक्षणे पडली आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत गरीब जनतेवर अन्याय होणार नाही,

औरंगाबाद : सुधारित विकास आराखड्यात काही ठिकाणी नागरी वसाहतींवर आरक्षणे पडली आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत गरीब जनतेवर अन्याय होणार नाही, अशी आरक्षणे बदलून ती दुसरीकडे पर्यायी जागेत टाकली जातील, असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी शनिवारी जाहीर केले. महापौर तुपे यांनी शनिवारी जाधववाडी आणि परिसरातील काही वसाहतींची प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील छत्रपतीनगर, पिसादेवी, मारोतीनगर, रामेश्वरनगर, मयूर पार्क, म्हसोबा मंदिर परिसर या भागांतील वसाहतींवर काही ठिकाणी वेगवेगळी आरक्षणे पडली आहेत. त्याविषयी येथील नागरिकांनी महापौरांकडे तक्रार केली. आम्ही येथे २० ते २५ वर्षांपासून राहतो, या वसाहती जुन्या आहेत. त्यामुळे ही आरक्षणे उठविली गेली पाहिजेत, अशी मागणी या नागरिकांनी महापौरांकडे केली. यानंतर सायंकाळी महापौरांनी विकास आराखड्यातील आरक्षणामध्ये बदल केला जाणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, शहरात अनेक ठिकाणी नागरी वसाहतींवर आरक्षणे पडलेली आहेत. ते चुकीचे आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत गरीब जनतेवर अन्याय होणार नाही, जिथे जिथे असे आरक्षण असेल ते बदलण्याचा आमचा प्रयत्न राहील. शक्य असेल तिथे अशी आरक्षणे काढून ती बाजूच्या मोकळ्या जमिनीवर टाकली जातील. सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तसा निर्णय घेतला जाईल, असेही महापौर म्हणाले.