शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मोफत वाळूसाठी पट्टे ठेवणार राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:03 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने घरकुलाच्या बांधकामासाठी ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला असून शासन आदेशाची या ...

औरंगाबाद : राज्य शासनाने घरकुलाच्या बांधकामासाठी ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला असून शासन आदेशाची या वर्षापासून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हा गौण खनिज अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी दिली. यासाठी काही वाळूपट्टे राखीव ठेवण्यात येणार आहेत. ते पट्टे कोणते असतील हे आत्ताच सांगता येणार नाही, असेही दोड यांनी सांगितले.

सामान्य नागरिकांना बांधकामासाठी महागडी वाळू घ्यावी लागते. त्यामुळे जिल्ह्यातील काही पट्ट्यातील वाळू शासन आदेशानुसार घरकूल बांधकामासाठी राखीव ठेवली जाणार आहे. सामान्यांना घरकूल बांधकामासाठी त्या पट्ट्यातून प्रत्येकी ५ ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे. या वर्षापासून आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी एक एसओपी तयार करण्याचे काम सुरू आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांनंतर गेल्या वेळी पाच वाळू पट्ट्यांचे लिलाव करण्यात आले होते. यातून शासनाला अपेक्षित महसूल मिळाल्याचा दावा करीत डॉ. दोड यांनी सांगितले, आठ महिन्यांसाठी परवानगी दिलेल्या वाळू पट्ट्यांतून केवळ पाच महिनेच कंत्राटदारांना वाळूउपसा करणे शक्य झाले. पावसाळा सुरू होताच प्रशासनाने सर्व घाट बंद केले. तसेच पट्ट्यांच्या लिलावाला स्थगिती दिली. ३० सप्टेंबरपर्यंत जुन्या लिलावांची मुदत आहे. यंदाचा पावसाळा संपल्यानंतर नव्याने प्रक्रिया करावी लागणार आहे.

यंदा १२ पट्ट्यांचे प्रस्ताव

२०२१-२२ साठी १२ वाळूपट्ट्यांसाठी राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन समितीकडे प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. त्या सर्वांना मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा गौण खनिज विभागाला आहे. त्यासाठी जिल्हा गौण खनिज विभागाने वाळूपट्ट्यांच्या लिलावासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. शासनाच्या नव्या नियमामुळे या प्रक्रियेला अधिक वेळ लागत असल्याने महिनाभर अगोदरपासूनच तयारी केली जात आहे.