शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आरक्षित पाण्याचा उपसा सुरु

By admin | Updated: July 6, 2014 00:26 IST

आशपाक पठाण , लातूर पावसाने ओढ दिल्याने लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़

आशपाक पठाण , लातूरपावसाने ओढ दिल्याने लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ त्यातही ५ लाखांवर लोकसंख्या असलेल्या लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पापैकी मोजक्याच प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध आहे़ मोठे, मध्यम व लघु असलेल्या १३७ प्रकल्पांपैकी ९२ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ तर लातूर, औसा, निलंगा व देवणी तालुक्यात सर्वच प्रकल्प कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे चटके तीव्र होत आहेत़ उपलब्ध असलेल्या प्रकल्पातील पाणीसाठ्यांतून शेतीसाठी उपसा सुरूच असल्याने दिवसेंदिवस पाणीपातळीत मोठी घट होत आहे़ वाढती टंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठ्यांचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी व्हावा, असे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहेत़लोकमत चमूने शनिवारी जिल्ह्यातील पाणी साठ्यांची पाहणी केली़ या पाहणीत बहुतांश पाणीसाठ्यांचा उपयोग शेतीसाठी करण्यात येत असल्याचे आढळून आले़ लातूर जिल्ह्यात तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरू, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प आहेत़ यापैकी रेणापूर २०, तिरू १६, देवर्जन ३४, साकोळ १९, घरणी २०, मसलगा मध्यम प्रकल्पात १२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे़ आठ प्रकल्पाची एकूण सरासरी १५ टक्के असली वाढती उष्णता व शेतीसाठी होणारा उपसा यामुळे पाणीसाठ्यात मोठी घट होत आहे़ जिल्ह्यात असलेल्या १२७ लघु प्रकल्पांपैकी ९२ प्रकल्पांना कोरड पडली आहे़प्रकल्पांतील पाणीसाठ्याच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके धोक्यात आली आहेत़ तर दुसरीकडे पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेक गावे टंचाईच्या गर्तेत अडकली आहेत़ लातूर तालुक्यातील ६, औसा १५, देवणी तालुक्यातील ११ लघुप्रकल्प कोरडेठाक आहेत़ ग्रामीण भागातील विहिरी, विंधन विहिरीचे पाणी तळाला गेल्याने पाणीटंचाई वाढली आहे़ जिल्ह्यात जळकोट तालुक्यातील १५ पैकी चार प्रकल्पाने तळ गाठला असला तरी ११ प्रकल्पात बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक आहे़ पाणीसाठा शिल्लक असल्याने त्या प्रकल्पावरील शेतकऱ्यांनी पाण्याचा भरमसाठ उपसा सुरू केला आहे़ मात्र, प्रशासनाने अजून एकही कारवाई केलेली नाही़उपसा थांबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशलातूर जिल्ह्यातील पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्गमित करण्यात आला होता़ शासन निर्णयानुसार सद्यस्थितीत लातूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने टंचाई निर्माण झाली आहे़ पेयजल टंचाईच्या निवारणार्थ करावयाच्या संभाव्य उपाययोजनांच्या अनुषंगाने मोठे, मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावेत, असे आदेश आहेत़ त्यामुळे सदरील प्रकल्पातील पाणी शेती अथवा इतर कारणासाठी वापरले जाणार नाही याची दक्षता घ्यावी़ सर्व प्रकल्पातील पाण्याचा अनाधिकृत उपसा बंद करण्यासाठी पथक नियुक्त करून कालबध्द कार्यक्रम तयार करावा़ त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ विपीन शर्मा यांनी ३ जुलै रोजी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिले आहेत़ लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणानेही तळ गाठल्याने लातूरकरांची तहान भागविणे कठीण झाले आहे़ प्रकल्पात चर खोदूनही उपयुक्त पाणी मिळत नसल्याने पंप बंद पडण्याची वेळ आली आहे़ शहरात पाणीटंचाईचे चटके वाढल्याने नागरिकांची भटकंती होत आहे़ नागझरी प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे़ मात्र, या प्रकल्पातून काही ठिकाणी मोटारी सुरू असल्याचे शनिवारी आढळून आले़