शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

आरक्षित तिकीट रद्द करणे महागले

By admin | Updated: June 12, 2017 00:31 IST

औरंगाबाद : एसटी महामंडळाने रेल्वेच्या धर्तीवर आरक्षित तिकीट रद्द करण्याची पद्धती स्वीकारली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळाने रेल्वेच्या धर्तीवर आरक्षित तिकीट रद्द करण्याची पद्धती स्वीकारली आहे. यापुढे बस सुटण्याच्या चार तास अगोदर तिकीट रद्द केल्यास ५० टक्के रक्कम कपात होईल. आतापर्यंत चार तास अगोदर तिकीट रद्द केल्यास केवळ ५ ते १० रुपये कपात करून पूर्ण रक्कम परत केली जात होती. नव्या बदलामुळे आरक्षित तिकीट रद्द करणे चांगलेच महागले आहे.आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या या नव्या बदलाची १० जूनपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. एसटी महामंडळातर्फे मागील अनेक वर्षे आरक्षित तिकीट रद्द केल्यावर परतावा दिला जातो; परंतु यामध्ये बदल करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली. रेल्वे प्रशासनाचा कित्ता एसटी महामंडळाने गिरविल्याचे दिसते. त्यामुळे एसटी तिकीट आरक्षण केल्यानंतर ते रद्द करण्याची वेळ आल्यास प्रवाशांना भुर्दंड बसणार आहे. तिकीट दराबरोबर व्हॉल्वो बसच्या आरक्षणासाठी १०, एशियाड बसच्या आरक्षणासाठी ७, तर साध्या (लाल) बसच्या आरक्षणासाठी ५ रुपयांचे शुल्क आकारण्यात येते. आतापर्यंत बस निघण्याच्या चार तास अगोदर तिकीट रद्द केल्यास केवळ आरक्षण शुल्क कपात के ले जात होते. त्यामुळे ऐनवेळी प्रवास रद्द केल्यानंतरही प्रवाशांचे कोणतेही नुकसान होत नव्हते.गर्दीच्या कालावधीत एसटी बसला प्रवाशांची गर्दी असते. अशावेळी अनेक जण जागेचे आरक्षण करतात; परंतु खाजगी वाहतूकदारांकडून कमी रकमेत तिकीट उपलब्ध झाल्यास ‘एसटी’चे तिकीट रद्द करण्याचे प्रकार होतात. त्यातून नुकसान होत असल्याने हा बदल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.सूचनेनुसार बदलवरिष्ठ कार्यालयाकडून आरक्षित तिकीट रद्द करण्यासंदर्भातील बदलाची सूचना आली आहे. त्यानुसार बदल करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक स्वप्नील धनाड यांनी दिली.