शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

अधिकृत नागरी वसाहतीवर आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 00:56 IST

औरंगाबाद : शासनाने सादर केलेल्या शहर विकास आराखड्याचे पाकीट दोन दिवसांपूर्वीच मनपाच्या सर्वसाधारण सभेत फोडण्यात आले.

औरंगाबाद : शासनाने सादर केलेल्या शहर विकास आराखड्याचे पाकीट दोन दिवसांपूर्वीच मनपाच्या सर्वसाधारण सभेत फोडण्यात आले. आता नवीन विकास आराखड्याचा अभ्यास अनेक नागरिकांनी सुरू केला आहे. यामध्ये अनेक चुका झाल्याचे समोर येत आहे. पूर्वीच्या येलो झोनला ग्रीन झोन करण्यात आले आहे. काही भागात तर अधिकृत नागरी वसाहतींवर उद्यानाचे आरक्षण टाकल्याचे समोर येत आहे. या गंभीर चुकांमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.शहर विकास आराखड्याचे नकाशे दोन दिवसांपासून महापौर कार्यालयात पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. नकाशे पाहण्यासाठी नागरिक अलोट गर्दी करीत आहेत. काही झेरॉक्स चालकांनी नकाशाची प्रत मिळवून तीनशे ते चारशे रुपयांना नकाशे विकण्याचा ‘उद्योग’मनपा मुख्यालयाजवळ सुरू केला आहे. बीड बायपास रोडवरील गट नं. ३२ हा नागरी वसाहतीसाठी यापूर्वीच घोषित करण्यात आला आहे. त्याआधारे मनपाने शंभरपेक्षा अधिक घरांना बांधकाम परवानगी दिली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने या परिसराला एन-ए-४४ ची मंजुरी दिली. नागरिकांनी कोट्यवधी रुपये खर्च करून बंगले, घरे बांधली. या भागातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाईन, पाण्याची लाईन, पथदिवे आदी सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. मंजूर रेखांकनातील ओपन स्पेसही मनपाकडे हस्तांतरित करण्यात आली. सेल्फ डेव्हलपमेंट अंतर्गत मन्नान खान यांनी स्वत:च्या खिशातून नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मनपाने बांधकाम परवानगी देताना ज्या अटी व शर्थी टाकल्या होत्या, त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.