शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: August 7, 2015 01:16 IST

बीड : केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. जिल्हा दुष्काळाने होरपळत असतानाच पशुधन वाचविणे कठीण झाले असल्याने चारा छावण्या सुरू करण्यासाठी आमदारांनी

बीड : केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. जिल्हा दुष्काळाने होरपळत असतानाच पशुधन वाचविणे कठीण झाले असल्याने चारा छावण्या सुरू करण्यासाठी आमदारांनी आपल्या मंत्र्याकडे मागणी करून त्यास मंजुरी आणणे अपेक्षित असतानाच बीड जिल्ह्याच्या भाजपच्या विद्यमान आमदारांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देऊन चारा छावण्या उभारण्याची मागणी केली असल्याची धक्कादायक आणि हास्यास्पद बाब समोर आली आहे.मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात चाऱ्याचा तुटवडा आहे. एवढेच नाहीतर लिंबाचा पाला टाकूण जनावरे जगवली जात आहेत. चाऱ्याची अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील भाजपच्या आमदारांनी चारा उपलब्धतेसाठी कुठलीच ठोस पावले उचलली नाहीत मात्र दोन दिवसापूर्वी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यात चारा टंचाई असल्याने छावण्या उभाराव्यात असा आग्रह मदत व पुनर्वसन मंत्र्याकडे धरल्यानंतर दोन महिने उशिराने का होईना बीडच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जाग आली असून गुरूवारी या सर्वांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्यांंना निवेदनही दिले.यावेळी आ. आर. टी. देशमुख, आ. भिमराव धोंडे, आ. अ‍ॅड. लक्ष्मण पवार यांची बैठकीला उपस्थिती होती. जिल्हयातील जणावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जून महिन्यापासून निर्माण झालेला आहे. असे असताना आजवर केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार शासन, प्रशासनाकडून झालेला आहे. यामुळे पशुमालाकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे. चाऱ्या अभावी शेतकऱ्यांना कवडीमोल भावात आपली जणावरे विकावी लागली. काही शेतकऱ्यांनी तर फुकट जनावरे वाटली.असे असताना देखील आमदारांनी चारा उपलब्ध करण्याच्या दुष्टीकोणातून कुठलेच ठोस पावले उचलले नाहीत. जून महिन्यातच जिल्हयातला संपूर्ण चारा संपला होता. शेतकऱ्यांनी चारा नसल्याची ओरड करूनही दुर्लक्ष झाले होते. मात्र दोन महिने उशिराने का होईना बीड जिल्ह्यातील आमदारांना जाग आल्याने चाऱ्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा पशुमालकांना लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)गुरूवारी भाजप आमदारांनी जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेवून चारा टंचाई संदर्भात आढावा घेतला. शिवाय चारा, पाणी उपलब्धते बाबत आग्रह धरला. मात्र या बैठकीला केजच्या भाजप आमदार संगिता ठोंबरे यांची गैरहजेरी होती.राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार आहे. शिवाय पालकमंत्री पंकजा मुंडे असताना देखील भाजपच्या आमदारांना जिल्हयातील समस्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून छोट-छोट्या समस्यांच्या निवारणासाठी मागणी करावी लागत असल्याचे चित्र जिल्हयात पहावयास मिळत आहे. त्यांच्या या कृत्याने भाजपच्या जुन्या काळाची आठवण यानिमित्ताने समोर आली आहे. त्यांची जुनी सवय गेली नाही असे यावरून सिध्द होते.