शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

शाळा भेटीचा अहवाल घेऊन बैठकांना या

By admin | Updated: December 17, 2014 00:38 IST

औरंगाबाद : केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदींच्या शाळा भेटी जवळजवळ बंद झाल्या आहेत. त्यामुळे शाळांवरील त्यांचे नियंत्रण संपले असून, त्याचा फटका गुणवत्तेला बसतो आहे.

औरंगाबाद : केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदींच्या शाळा भेटी जवळजवळ बंद झाल्या आहेत. त्यामुळे शाळांवरील त्यांचे नियंत्रण संपले असून, त्याचा फटका गुणवत्तेला बसतो आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शिक्षण समितीच्या बैठकीला येताना शाळाभेटींचा दरमहा अहवाल सोबत घेऊनच यावे, अशी सक्ती शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी केली आहे. सभापती तांबे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यावर आमचा भर आहे. या दृष्टीने विचार करताना असे समोर आले की केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या शाळा भेटी अत्यल्प झाल्या आहेत. त्यामुळे शालेय कामकाजावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहत नाही. याचा विपरीत परिणाम शालेय गुणवत्तेवर दिसून येतो. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे शालेय गुणवत्तेचा विषय आम्ही पहिल्याच बैठकीत चर्चेला घेतला. केंद्रप्रमुखांच्या अखत्यारीत दहा-बारा शाळा असतात. त्यामुळे त्यांनी प्रत्येक शाळेला महिन्यातून किमान चार वेळा भेटी देणे अनिवार्य आहे. विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांनी शाळेला महिनाभरातून एकदा तरी भेट दिली पाहिजे. गुणवत्ता तपासली पाहिजे. भेटी दिल्याने शिक्षक गुणवत्तेवर भर देतील. शाळा कुणीच तपासत नाही, हे लक्षात आल्यामुळेच शिक्षकही अध्यापनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीचा अहवाल शालेय समितीच्या मासिक बैठकीत सादर करणे अनिवार्य केले आहे, अशा आशयाचे पत्र शिक्षण सभापतींनी शिक्षणाधिकाऱ्यांना लिहिले आहे. या पत्राचा संदर्भ देत शिक्षणाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन तयारीनिशी येण्याचे सुचविले आहे.