शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

भाडेकरूंची माहिती कळवा; अन्यथा फौजदारी

By admin | Updated: September 17, 2014 01:08 IST

औरंगाबाद : आगामी निवडणूक आणि सणासुदीच्या काळात बाहेरच्या काही व्यक्ती येथे येऊन घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद : आगामी निवडणूक आणि सणासुदीच्या काळात बाहेरच्या काही व्यक्ती येथे येऊन घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व घरमालक, हॉटेल, लॉजमालक आणि संस्थांनी त्यांच्याकडे असलेल्या भाडेकरूंविषयी तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवावे; अन्यथा मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी दिला आहे. अल्प काळासाठी वास्तव्यास येऊन काही व्यक्तींनी घातपात घडविल्याच्या घटना यापूर्वी मुंबई, पुणे या शहरांमध्ये घडलेल्या आहेत. सणासुदीच्या काळात, निवडणुकीच्या काळात बाहेर जिल्ह्यातील किंवा राज्यातील व्यक्ती येतात आणि घातपाती कृत्य करून परत निघून जातात, असे यापूर्वी अनेकदा उघडकीस आलेले आहे. तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि दसरा, दिवाळी सणातही असे कृत्य घडण्याची शक्यता औरंगाबादेत नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कुंभारे यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपल्या घर, हॉटेल, लॉजमध्ये वास्तव्यासाठी येणाऱ्या भाडेकरूचे नाव, मूळ पत्ता, ओळखपत्र, मोबाईल क्रमांक घ्यावा, त्यानंतरच त्याला वास्तव्य करू द्यावे. शिवाय या भाडेकरूची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ कळवावी; अन्यथा संबंधित मालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशाराही पोलीस अधीक्षक कुंभारे यांनी दिला आहे.