दिवाळीपूर्वी अतिवृष्टी मदतीचे वाटप
औरंगाबाद: जिल्ह्यासाठी अतिवृष्टीसाठी पहिल्या टप्यात १४३ कोटी रुपये मिळाले आहेत. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची बैठक घेतली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात २८३ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविलेला आहे. त्यामुळे तातडीने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.