शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रेणूने दिला दोन पिलांना जन्म; पिलांची प्रकृती ठणठणीत

By admin | Updated: September 11, 2016 01:24 IST

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात शनिवारी सकाळी ‘रेणू’या बिबट्या मादीने दोन पिलांना जन्म दिला.

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात शनिवारी सकाळी ‘रेणू’या बिबट्या मादीने दोन पिलांना जन्म दिला. रेणू आणि दोन्ही पिल्लं अगदी ठणठणीत असून, सुरक्षेच्या दृष्टीने रेणूजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी प्राणिसंग्रहालयातील डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्या निष्काळजीपणामुळे रेणूच्या तीन पिलांचा मृत्यू झाला होता. मागील अनुभव लक्षात घेऊन मनपा प्रशासन रेणूच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही.१७ फेबु्रवारी २०१६ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथून बिबट्याची एक जोडी औरंगाबादेत आणण्यात आली. रेणू आणि राजा यांना ४०७ मेटॅडोरने ८०० किलोमीटरचा प्रवास घडवून आणण्यात आले होता. रेणू गरोदर असताना तिला हा धोकादायक प्रवास घडवून आणण्यात आला. सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात तिला आणल्यानंतर तिने अन्न, पाणी घेणे सोडले. प्राणिसंग्रहालयाचे तत्कालीन संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी तिला गॅस्ट्रो झाला असावा म्हणून चुकीचे औषधोपचार सुरू केले. त्यामुळे नियोजित वेळेपूर्वीच रेणूने तीन पिलांना जन्म दिला. या पिलांची योग्य निगाही न राखल्याने अवघ्या २४ तासांत त्यांचा मृत्यू झाला होता. रेणूच्या पिलांचे मृत्यू प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला. चौकशीत डॉ. नाईकवाडे दोषी असल्याचे दिसून आले. त्यामुळे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले.नाईकवाडे यांच्या जागी एक निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी कंत्राट पद्धतीवर नेमण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्याकडे प्राणिसंग्रहालय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. जुने दु:ख विसरून रेणू पुन्हा उद्यानात मागील काही दिवसांपासून राजासोबत खेळत-बागडत होती. अलीकडेच तिला पुन्हा गर्भधारणा झाली होती. ही बाब प्राणिसंग्रहालय विभागाने गोपनीय ठेवून तिच्यावर योग्य औषधोपचार सुरू ठेवले. शनिवारी सकाळी ११ वाजता रेणूने दोन गोंडस पिलांना जन्म दिला. सध्या सुरक्षेच्या कारणावरून तिच्याजवळ कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मार्च २०१६ मध्ये रेणूच्या तीन पिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. तिने काही दिवस अन्नत्यागही केला होता. डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर रेणू काही दिवसांनंतर नॉर्मल झाली होती. मनपा प्रशासन रेणूच्या बाबतीत रिस्क घेण्यास तयार नाही. तिला सर्वोत्तम औषधोपचार आणि सेवा देण्यात येत असल्याचे सूत्रांनी नमूद केले.