शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीत नाव नोंदणीची पुन्हा संधी

By admin | Updated: September 11, 2014 00:36 IST

जालना : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पुनर्रचनेचा कार्यकम जाहीर झाला

जालना : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पुनर्रचनेचा कार्यकम जाहीर झाला असून, निवडणूक विभागाने नवीन मतदार नोंदणीसाठी पुन्हा संधी उपलब्ध करुन दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ नंतर ९ ते ३० जून २०१४ या कालावधीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कालावधीनंतर देखील मतदार नोंदणीचा कार्यक्रम सतत सुरु आहे. लोकसभा निवडणूका झाल्यानंतर एकूण २२ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. लवकरच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत होणार असून त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने नोंदणीसाठी पुन्हा संधी उपलब्ध करुन दिली आहे. ज्या मतदाराचे नांव मतदार यादीत नाही, त्यांनी मतदार यादीत आपल्या नावाची नोंद आवश्यक त्या कागदपत्रांसह करावी. मतदार यादीमध्ये आपले नांव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करुन घ्यावी. मतदार यादीत नांव नसेल तर अशा मतदारांनी आपले नांव मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना-६ अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा मतदार मदत केंद्रामध्ये जाऊन भरावा.विधानसभेसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस आधीपर्यंत मतदारांना मतदार यादीत नांव नोंदणी करता येईल. ज्या नागरिकांकडे जुने मतदार ओळखपत्र आहे, परंतु त्यांचे नांव मतदार यादीमध्ये नाही किंवा वगळले आहे अशा नागरिकांनी त्यांच्या सामान्य रहिवासाचा पत्ता मतदार ओळखपत्राप्रमाणेच असल्यास जुन्या मतदार ओळख पत्राच्या छायाप्रतीसह नुमना-६ अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यांना इतर पुरावे सादर करण्याची गरज राहणार नाही.