जालना : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पुनर्रचनेचा कार्यकम जाहीर झाला असून, निवडणूक विभागाने नवीन मतदार नोंदणीसाठी पुन्हा संधी उपलब्ध करुन दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ नंतर ९ ते ३० जून २०१४ या कालावधीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कालावधीनंतर देखील मतदार नोंदणीचा कार्यक्रम सतत सुरु आहे. लोकसभा निवडणूका झाल्यानंतर एकूण २२ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. लवकरच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत होणार असून त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने नोंदणीसाठी पुन्हा संधी उपलब्ध करुन दिली आहे. ज्या मतदाराचे नांव मतदार यादीत नाही, त्यांनी मतदार यादीत आपल्या नावाची नोंद आवश्यक त्या कागदपत्रांसह करावी. मतदार यादीमध्ये आपले नांव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करुन घ्यावी. मतदार यादीत नांव नसेल तर अशा मतदारांनी आपले नांव मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना-६ अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा मतदार मदत केंद्रामध्ये जाऊन भरावा.विधानसभेसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस आधीपर्यंत मतदारांना मतदार यादीत नांव नोंदणी करता येईल. ज्या नागरिकांकडे जुने मतदार ओळखपत्र आहे, परंतु त्यांचे नांव मतदार यादीमध्ये नाही किंवा वगळले आहे अशा नागरिकांनी त्यांच्या सामान्य रहिवासाचा पत्ता मतदार ओळखपत्राप्रमाणेच असल्यास जुन्या मतदार ओळख पत्राच्या छायाप्रतीसह नुमना-६ अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यांना इतर पुरावे सादर करण्याची गरज राहणार नाही.
मतदार यादीत नाव नोंदणीची पुन्हा संधी
By admin | Updated: September 11, 2014 00:36 IST