शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

निर्बंध हटवाच; व्यवसाय घटल्याने व्यापाऱ्यांचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 18:36 IST

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्यास तिसऱ्या यादीत टाकले आहे.

ठळक मुद्देनियम शिथिलतेसाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार द्यावा

औरंगाबाद : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अतिअल्प असताना, येथे तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कसे व का लावले? सरकार व्यापाऱ्यांच्या जिवावर उठले आहे का? असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. दोन दिवसांपासून पुन्हा लागू केलेल्या निर्बंधामुळे व्यवसाय घटून २० ते ३० टक्क्यांवर आला आहे. स्थानिक पातळीवर रुग्णसंख्या पाहून निर्बंध शिथिल करण्याचा किंवा वाढविण्याचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण अधिकार द्यावेत, अशी मागणी होते आहे. सरकारने निर्णय बदलला नाही, तर नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला.

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्यास तिसऱ्या यादीत टाकले आहे. यामुळे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजताच दुकाने बंद करावी लागत आहेत. तसेच शनिवार, रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. मंगळवारपासून या नवीन निर्बंधाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दोन दिवसात शहरातील व्यवसाय ७० टक्क्यांवरून घसरून २० ते ३० टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. व्यापारी स्वत:ची, कर्मचाऱ्यांची व ग्राहकांची संपूर्ण काळजी घेत आहेत. गंभीर परिस्थिती नसतानाही निर्बंध लादून सरकार व्यापाऱ्यांच्या ‘पोटा’वर पाय देत आहे, अशा संतप्त भावना शहरातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

पर्यटनाच्या राजधानीत नुकतीच पर्यटनस्थळे सुरू झाली. येथे शनिवार व रविवार पर्यटक जास्त असतात. त्याच दिवसात बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. यातून पर्यटन राजधानीबद्दलचा चुकीचा संदेश देशभरात जाईल. त्याचा दूरगामी परिणाम जिल्ह्यास भोगावा लागेल, असेही काही व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले.

सरकारने फेरविचार करावाशहरात कोरोना रुग्णांची संख्या दोन आकडी नसतानाही सरकारने तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लादले आहेत. हा अत्यंत चुकीचा आदेश देण्यात आला. याचा फेरविचार राज्य सरकारने करावा. कारण, मागील दोन दिवसात व्यवसाय मोठ्या प्रमाणात घटला आहे.- प्रफुल्ल मालाणी, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड ॲण्ड कॉमर्स

रस्त्यावर उतरावे लागेलशनिवार, रविवार दुकाने उघडण्यात यावीत, दररोज सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, याचे निवेदन आम्ही मुख्यमंत्री, पालकमंत्री, सर्व आमदार, खासदार, जिल्हाधिकारी सर्वांना दिले आहेत. मात्र, कोणीच व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकत नसेल, तर अखेर नाईलाजाने व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल. त्याशिवाय पर्याय नाही.- लक्ष्मीनारायण राठी, महासचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

निर्बंधाचा उलाढालीवर मोठा परिणामदुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने बंद करावी लागत आहेत. नेमका सायंकाळीच व्यवसाय होत असतो, पण नेमके त्याचवेळी लॉकडाऊन होत असल्याने उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. निर्बंध लावा, पण व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका.- अनिल चुत्तर, माजी अध्यक्ष, जिल्हा ऑटोमोबाईल ॲण्ड टायर डीलर्स असोसिएशन

सरकार व्यापाऱ्यांच्या जिवावर उठले आहे का?कोरोना रुग्णसंख्या १० च्या आत आली असताना २१ दिवसांनंतर पुन्हा कडक निर्बंध आणत आहे. हे सरकार व्यापाऱ्यांच्या जिवावर उठले आहे का? देशांतर्गत व्यापार सरकारला संपवायचा आहे का?- विनोद लोया, अध्यक्ष, कापड व्यापारी संघटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद