शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

माझे आजोळ असलेल्या लातूरची गैरसोय दूर करणार : भगवंत खुब्बा

By admin | Updated: May 8, 2017 23:34 IST

लातूरकरांची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण अस्मितेचा प्रश्न करून बीदरला रेल्वे न्यायला लातूरकरांनी विरोध करू नये, असे भावनिक आवाहन बीदरचे खा. भगवंत खुब्बा यांनी केले.

लातूरकरांना माझा जय महाराष्ट्र. माझे जन्मगाव बीदर असले, तरी लातूर माझे आजोळ आहे. लातूरशी माझेच नव्हे संपूर्ण बीदरकरांचे जुने संबंध आहेत. बीदरकर दवाखान्यासाठी लातूर जिल्ह्यात येतात. बाजार समितीसाठी लातूर जिल्ह्यात येतात. रोजगारासाठी लातूर जिल्ह्यात येतात, इतकेच नव्हे तर आमची सोयरिक लातूरशी आहे. लातूरची रेल्वे मी पळविली नाही, तर रोटीबेटीचे संबंध असलेल्या बीदरशी लातूर रेल्वे जोडली आहे. गर्दी असेल, तर लातूरकरांची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण अस्मितेचा प्रश्न करून बीदरला रेल्वे न्यायला लातूरकरांनी विरोध करू नये, असे भावनिक आवाहन बीदरचे खा. भगवंत खुब्बा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. लातूर रेल्वेसाठी लातूरकरांनी आयोजित केलेल्या रेल रोकोच्या पूर्वसंध्येला स्वत: लातूरमध्ये येऊन त्यांनी लातूरकरांना ही विनंती केली. पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, लातूर स्वातंत्र्यापूर्वी कधी काळी बीदर जिल्ह्याचा भाग होते. त्यामुळे आम्हाला लातूर कधीच परके वाटले नाही. हा जिल्हा माझ्यासाठी आजोळ आहे. त्याची गैरसोय मी कसे करेन. बीदरला लातूरशी जोडण्यासाठी माझी धडपड आहे. ती लातूरकरांनी समजून घ्यावी. लातूरच नव्हे, रोटीबेटीचे संबंध असलेल्या नांदेड जिल्ह्याशी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून आम्ही संबंध प्रस्थापित करू इच्छितो. गुलबर्गा-लातूर ही नवीन रेल्वे आम्ही मंजूर करून घेतली. बीदर-अहमदपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून घेतला. कर्नाटकातील टेंडर निघाले. महाराष्ट्रातील निघेल. शिवाय, गुलबर्गा-लातूर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग आम्ही मंजूर करून घेतला. संबंधासाठी रस्त्याची, रेल्वेची कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, हे समजून घ्यावे, असेही ते म्हणाले.