शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

माझे आजोळ असलेल्या लातूरची गैरसोय दूर करणार : भगवंत खुब्बा

By admin | Updated: May 8, 2017 23:34 IST

लातूरकरांची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण अस्मितेचा प्रश्न करून बीदरला रेल्वे न्यायला लातूरकरांनी विरोध करू नये, असे भावनिक आवाहन बीदरचे खा. भगवंत खुब्बा यांनी केले.

लातूरकरांना माझा जय महाराष्ट्र. माझे जन्मगाव बीदर असले, तरी लातूर माझे आजोळ आहे. लातूरशी माझेच नव्हे संपूर्ण बीदरकरांचे जुने संबंध आहेत. बीदरकर दवाखान्यासाठी लातूर जिल्ह्यात येतात. बाजार समितीसाठी लातूर जिल्ह्यात येतात. रोजगारासाठी लातूर जिल्ह्यात येतात, इतकेच नव्हे तर आमची सोयरिक लातूरशी आहे. लातूरची रेल्वे मी पळविली नाही, तर रोटीबेटीचे संबंध असलेल्या बीदरशी लातूर रेल्वे जोडली आहे. गर्दी असेल, तर लातूरकरांची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण अस्मितेचा प्रश्न करून बीदरला रेल्वे न्यायला लातूरकरांनी विरोध करू नये, असे भावनिक आवाहन बीदरचे खा. भगवंत खुब्बा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. लातूर रेल्वेसाठी लातूरकरांनी आयोजित केलेल्या रेल रोकोच्या पूर्वसंध्येला स्वत: लातूरमध्ये येऊन त्यांनी लातूरकरांना ही विनंती केली. पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, लातूर स्वातंत्र्यापूर्वी कधी काळी बीदर जिल्ह्याचा भाग होते. त्यामुळे आम्हाला लातूर कधीच परके वाटले नाही. हा जिल्हा माझ्यासाठी आजोळ आहे. त्याची गैरसोय मी कसे करेन. बीदरला लातूरशी जोडण्यासाठी माझी धडपड आहे. ती लातूरकरांनी समजून घ्यावी. लातूरच नव्हे, रोटीबेटीचे संबंध असलेल्या नांदेड जिल्ह्याशी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून आम्ही संबंध प्रस्थापित करू इच्छितो. गुलबर्गा-लातूर ही नवीन रेल्वे आम्ही मंजूर करून घेतली. बीदर-अहमदपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून घेतला. कर्नाटकातील टेंडर निघाले. महाराष्ट्रातील निघेल. शिवाय, गुलबर्गा-लातूर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग आम्ही मंजूर करून घेतला. संबंधासाठी रस्त्याची, रेल्वेची कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, हे समजून घ्यावे, असेही ते म्हणाले.