शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

फसवणूक कराल तर याद राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:09 IST

परभणी : कर्जमाफी करताना शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे़ शेतकरी सरकारवर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आ़ बच्चू कडू यांनी परभणीतील एल्गार मेळाव्यात बोलताना दिला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कर्जमाफी करताना शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे़ बोलले एक आणि केले वेगळेच़ असा प्रकार झाला असून, ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही़ त्यामुळे शासनाला २३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे़ त्यानंतर मात्र शेतकऱ्यांची फसवणूक केली तर याद राखा, शेतकरी सरकारवर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आ़ बच्चू कडू यांनी परभणीतील एल्गार मेळाव्यात बोलताना दिला़ राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर या माफीमध्ये अनेक शेतकरी वगळले गेले आहेत़ बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांना माफीचा फायदा होणार असल्याने या कर्जमाफीविरूद्ध राज्यस्तरीय सुकाणू समितीने मार्गदर्शन मेळावे आयोजित केले आहेत़ याचाच एक भाग म्हणून १९ जुलै रोजी परभणी शहरातील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात एल्गार मेळावा पार पडला़ या मेळाव्यास सुकाणू समितीचे प्रमुख नेते आ़ बच्चू कडू यांच्यासह रघुनाथदादा पाटील, अजित नवले, किशोर ढमाले, अशोक ढवळे, कालिदास आपेट, करण गायकर, डॉ़ अशोक घुले आदींची प्रमुख उपस्थिती होती़ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपूडकर, आ़ विजय भांबळे यांनीही मेळाव्यास उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला़ आ़ बच्चू कडू म्हणाले, सध्याचे सरकार म्हणजे घरात हातभट्टी आणि दरवाज्यात अगरबत्ती अशा प्रकारचे आहे़ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफीची घोषणा केली खरी़ परंतु, काढलेला अध्यादेश मात्र अफजल खानाचा आहे़ धर्माच्या, पैशाच्या जोरावर असे प्रकार कराल तर शेतकऱ्यांशी गाठ आहे़ हा शेतकरी बेैमान नसून आपल्या इमानदारीचे घेतल्याशिवाय राहणार नाही़, असा इशाराही त्यांनी दिला़ शासनाची कर्जमाफी ही फसवी असून, ती आम्हाला मान्य नाही़ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावे, आत्महत्या करू नयेत तर लढायला शिकावे, असे आवाहन करतानाच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करा, असा सल्लाही त्यांनी दिला़ आतापर्यंत धर्माच्या, जातीच्या नावावर आम्हाला खेळविले़ परंतु, आता मात्र शेतकरी कट्टरवादी झाला आहे़ हे जून महिन्यात शेतकऱ्यांच्या संपाने दाखवून दिले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही नेत्याची, धर्माची गरज नाही़ ‘गर्व से कहो हम किसान है’ असा नारा देत त्यांनी कर्जमाफी म्हणजे उपकार नव्हे तर शासन शेतकऱ्यांकडून लूटत असलेल्या पैशांचा परतावा आहे़ यावेळी बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली़ ‘नरेंद्र मोदी, किसान विरोधी’ अशा घोषणा देण्यात आल्या़ शेतीमालाला भाव नाही, कर्जमुक्ती नाही तर मतही नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले़ प्रारंभी सुकाणू समितीमधील सदस्य करण गायकर, रघुनाथदादा पाटील, किशार ढमारे, डॉ़ अशोक घुले, कालीदास आपेट यांचीही भाषणे झाली़ आ़ विजय भांबळे, सुरेश वरपूडकर यांनीही मार्गदर्शन केले. शेतकरी संघटनेच्या रसिका ढगे यांनी प्रास्ताविक केले़ किसान सभेचे कॉ़ विलास बाबर यांनी सूत्रसंचालन केले़ मेळाव्यास सुरेश भुमरे, स्वराजसिंह परिहार, रामभाऊ घाटगे, गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, अमृत शिंदे, श्रीनिवास जोगदंड, रामेश्वर आवरगंड, बालाजी मोहिते, विठ्ठल तळेकर, रामा शिंदे, धोंडीराम चव्हाण, सुभाष जावळे आदींसह जिल्हाभरातील हजारो शेतकरी उपस्थित होते़