शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

तीन ग्रामविकास अधिका-यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:10 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून तीन ग्रामविकास अधिकाºयांना दिलेल्या पदोन्नतीच्या पदावर जिल्हा परिषदेने काम करू द्यावे, असे आदेश देत न्यायालयाने सदरील पदोन्नत विस्तार अधिका-यांना पदावनत करण्याच्या शासनाच्या १३ डिसेंबरच्या पत्रास स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्या तीनही ग्रामविकास अधिका-यांना दिलासा मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून तीन ग्रामविकास अधिकाºयांना दिलेल्या पदोन्नतीच्या पदावर जिल्हा परिषदेने काम करू द्यावे, असे आदेश देत न्यायालयाने सदरील पदोन्नत विस्तार अधिका-यांना पदावनत करण्याच्या शासनाच्या १३ डिसेंबरच्या पत्रास स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्या तीनही ग्रामविकास अधिका-यांना दिलासा मिळालाआहे.मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समितीने १७ नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन ग्रामविकास अधिकारी के. वाय. झोंड, एस. एस. सोनवणे व एस. के. कचकुरे या तिघांना सेवाज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातील विस्तार अधिकारीपदावर पदोन्नती दिली. कामाची निकड व पदे व्यपगत होऊ नये, यासाठी सदरील पदोन्नतीची संचिका नोव्हेंबर २०१६ पासून सुरू होती. सेवाज्येष्ठता सूचीबाबत विभागीय आयुक्तांचे मार्गदर्शन मागवून जि. प. प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती दिली होती. पदोन्नती समितीची बैठक ३ नोव्हेंबर रोजी आयोजित केली होती; पण शासनाने २ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार १३ नोव्हेंबरपर्यंत ही बैठक तूर्त स्थगित केली होती.त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी खुल्या प्रवर्गातील या तीनही ग्रामविकास अधिकाºयांना पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्यात आली होती. प्रशासनाने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करून पदोन्नतीला जिल्हा परिषद सदस्यांनी आक्षेप घेतला होता. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार संदीपान भुमरे पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. त्यानुसार शासनाने १३ डिसेंबर रोजी परिपत्रक जारी करून त्या तीनही विस्तार अधिकाºयांना पदावनत करून त्यांच्या मूळ पदावर पुनर्स्थापित करण्याचे जिल्हा परिषदेला आदेश दिले होते. शासनाच्या त्या पत्रानुसार तत्कालीन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी कार्यवाही केली होती. त्यास ग्रामविकास अधिकाºयांनी खंडपीठात आव्हान दिले आहे.न्यायसंस्थेचा आदर करणे क्रमप्राप्तयासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, न्यायसंस्थेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सध्या ते तिघेही त्यांच्या पहिल्या मूळ पदावर कार्यरत करण्यात आले आहेत.४ न्यायालयाच्या आदेशानुसार आता त्यांच्या सेवा पदोन्नतपदावर पुनर्स्थापित कराव्या लागतील. या याचिकेत शासन, ग्रामविकास विभागाचे सचिव व जि. प. प्रशासन प्रमुख या नात्याने मी प्रतिवादी आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जानेवारी रोजी होणारआहे.