शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

बेसुमार पाणी वापराला बसणार लगाम

By admin | Updated: August 19, 2014 02:08 IST

नांदेड: पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शहराला आठवड्यातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय महापालिका घेणार आहे़ उपलब्ध असलेले

 

नांदेड: पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शहराला आठवड्यातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय महापालिका घेणार आहे़ उपलब्ध असलेले ९ दलघमी पाणी दोन दिवसाआड सोडल्यास दीड महिना पुरणार आहे़ अशा वेळी नागरिक पेयजलाचा वापर बांधकाम, वाहने धुणे, अंगण स्वच्छता करणे व पाळीव प्राणी धुण्यासाठी करत असल्याचे चित्र समोर आले आहे़ या पार्श्वभूमीवर महापालिका पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पथक स्थापन करून पाणी बचतीचे धोरण राबविणार आहे़ नांदेडकरांना यापुर्वी पाणीटंचाईची झळ पावसाळ्यात कधीच बसली नाही़ विष्णूपुरी प्रकल्पातील मुबलक पाण्यामुळे नांदेडकरांच्या घशाला कोरड कधीच पडली नाही़ मात्र यंदा पावसाने पाठ फिरविल्याने प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला आहे़ त्यामुळे पाण्याविषयी सर्वांनाच आपल्या दैनंदिन सवयीत बदल करावा लागणार आहे़ महापालिकेने यापुर्वीच पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असले तरी याचे गांर्भीय नागरिकांनी अद्याप घेतले नाही़ मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची नासाडी थांबविल्यास संभाव्य पाणी टंचाईवर मात करता येईल़ त्यासाठी आता नागरिकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे़ सध्या दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येते़ हे साठविलेले पाणी शिळे झाले म्हणून दुसऱ्या दिवशी फेकून दिले जाते़ हे चुकीचे आहे़ खरे तर व्यवस्थित झाकून ठेवल्यास पाणी खराब होत नाही़ ही जागृती महापालिका, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय स्तरावर होणे आवश्यक आहे़ (प्रतिनिधी) नांदेड शहराला सध्या दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येतो़ मात्र विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीपातळी घटल्याने महापालिका लवकरच आठवड्यातून एक वेळेस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेणार आहे़ जिल्हादिवसाआड पाणीपुरवठा लातूर - १० परभणी - ८ उस्मानाबाद - ४ जालना - ८ औरंगाबाद - ३ हिंगोली - ४ बीड - ८ पाणी बचतीचे उपाय बादलीत पाणी घेऊन आंघोळ केल्यास १८ लिटर पाणी लागते़ शॉवरखाली आंघोळ केल्यास कमीत कमी १०० लिटर पाणी वापरले जाते़ नळ सोडून दाढी केली तर १० लिटर; मगमध्ये पाणी घेतल्यास एक लिटऱ नळ उघड ठेवून ब्रश केले तर १० लिटर; मगमध्ये पाणी घेतल्यास १ लिटर, वाहत्या नळाखाली कपडे धुताना ११६ लिटर पाणी लागते, तर बदलीचा वापर केला तर ३६ लिटर लागते़ ४मोटार धुण्यासाठी पाइपचा वापर केला तर १०० लिटर पाणी लागते़ परंतु कपडा बादलीत भिजवून कार धुतली तर १८ लिटर पाण्यात काम होते़ वाहत्या नळाखाली हात धुतले तर १० लिटर, मगमध्ये पाणी घेतले तर अर्धा लिटऱ घरगुती कामासाठी अशा पाणी बचतीचा अवलंब केल्यास प्रत्येक व्यक्तीला ८०़५ लिटर पाणी पुरते़ नेहमीच्या पद्धतीने प्रत्येकाला ३६६ लिटर पाणी लागते़ म्हणजे प्रत्येक व्यक्तीमागे २८५़५ लिटर पाण्याच बचत होऊ शकते़ प्रत्येक कुटुंबात पाच व्यक्ती गृहीत धरल्या तर दर दिवशी १ हजार ४२७ लिटर, तर महिन्यात ४५ हजार ८२५ लिटर पाणी वाचवू शकतो़ हे केल्यास - १) पिण्याच्या पाण्यासाठी छोटे ग्लास केल्यास पाण्यात बरीच बचत होते़ अनेक वेळा मोठ्या ग्लासमधील अर्ध्यापेक्षा जास्त पाणी फेकूनच दिले जाते़ २) टाकी भरल्यानंतर जादा पाणी बाहेर पडण्यासाठी पाइप बसवला तर टाकी भरली हे समजल्याबरोबर नळ लगेच बंद केल्यास पाण्याची नासाडी होणार नाही़ ३) घरातील नळ थेंब थेंब गळत असतो़ त्याकडे आपण दुर्लक्ष करतो़ अशा गळतीमुळे २४ तासांत सुमारे ४- ५ लिटर पाणी वाया जाते़