शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय स्थलांतरात पुन्हा विघ्न

By admin | Updated: August 24, 2014 00:17 IST

संतोष धारासूरकर ,जालना ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न’ या प्रचलित म्हणीचा प्रत्यंतर येथील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी अनुभवत आहेत.

संतोष धारासूरकर ,जालना ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न’ या प्रचलित म्हणीचा प्रत्यंतर येथील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी अनुभवत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते सुमारे ५५ कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या महिला व बाल रुग्णालयाच्या नूतन इमारतीचा भूमीपूजन सोहळा गेल्या महिन्यात पार पडला खरा; परंतू सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी इमारत स्थलांतरास अद्यापपर्यंत हिरवा कंदिल न दिल्याने जुन्या धोकादायक इमारतीतील महिला व बाल रुग्णालयाचे स्थलांतर रखडले आहे. शहराच्या मध्यवस्तीतील गांधी चमन भागात महिला व बाल रुग्णालय कार्यरत आहे. परंतु त्या रुग्णालयाची इमारत जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळेच २००६ साली या इमारतीचा सार्वजनिक बांधकाम खात्याने सर्वे केला. ती इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचा अहवाल सुध्दा सादर केला. येथून ही इमारत तातडीने अन्यत्र स्थलांतरीत करावी, अन्यथा अधिकाऱ्यांसह कर्मचारी व रुग्णांच्या जीवीतास धोका पोहोचेल असाही इशारा दिला. त्यानुसारच आरोग्य खात्याने तातडीने हालचाली सुरु केल्या. नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर केला. सरकारी पातळीवरील असंख्य टप्पे पार पाडीत अखेर या प्रस्तावास हिरवा कंदिल मिळाला. वर्षानुवर्षे सरकारी लालफितीतून बाहेर पडलेल्या नूतन इमारतीच्या प्रस्तावास ५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. तेव्हा आरोग्य खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या इमारतीच्या बांधकामास लवकरच मुहूर्त लागेल. असे अपेक्षित होते. परंतु जुन्या इमारतीतून अन्यत्र रुग्णालयाच्या तात्पुरत्या स्थलांतराचा प्रश्न उभा राहिला. त्यातही दीड-दोन वर्ष खर्ची झाल्यानंतर जवळीच एका इमारतीत स्थलांतर निश्चित झाले. मात्र, माशी कुठे शिंकली, हे अद्याप कळले नाही. धोकादायक इमारतीतून हे रुग्णालय त्या निश्चित केलेल्या इमारतीत अद्यापपर्यंत स्थलांतरीत झाले नाही. ‘लोकमत’ने यासंदर्भात अधिक माहिती घेतली तेव्हा, धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. स्थलांतरीत केल्या जाणाऱ्या ‘त्या’ इमारतीवर २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. संबंधित औरंगाबाद येथील एजन्सीला बांधकाम खात्याने तो खर्च दिला नाही. परिणामी एजन्सीने ही इमारत बांधकाम खात्यास हस्तांतरीतच केली नाही. बिले द्या, असा तगादा करुन सुध्दा अभियंत्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. परिणामी, महिला व बाल रुग्णालयाच्या नूतन इमारतीस ५५ कोटी रुपये प्राप्त होऊन सुध्दा केवळ एका हस्तांतराच्या प्रमाणपत्रासाठी रुग्णालयाच्या इमारतीचे स्थलांतर ठप्प झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री शेट्टी यांच्या हस्ते १० आॅगस्ट रोजी या इमारतीचे भूमीपूजन होणार होते. परंतु निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरच भूमिपूजनाचा तो सोहळा गेल्या महिन्यातच आटोपन्यात आला. त्यामुळे रुग्णालय नव्या जागेत स्थलांतरीत होईल व जुनी इमारत लगेचच जमिनदोस्त केली जाईल, असे अपेक्षित होते. मात्र, भूमीपूजन झाल्यानंतरसुध्दा हे काम तांत्रिक कारणे दाखवून पुन्हा लटकवण्यात आले आहे. नाशिक येथील एका एजन्सीला या इमारतीचे काम बहाल करण्यात आले असून त्या एजन्सीने बांधकामासाठी मशिनरी आणली. वाळूचा साठा जमा केला. परंतु रुग्णालय नव्या जागेत स्थलांतरीत झाले नाही. त्यामुळे संबंधित एजन्सी गेल्या महिनाभरापासून कमालीची अडचणीत सापडली आली. धोकादायक इमारत पाडल्याशिवाय नवीन इमारतीचे काम करता येणार नाही, हे स्पष्ट आहे.