शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

समांतरपुढे पालिका प्रशासन हतबल

By admin | Updated: December 14, 2015 23:58 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेतही पुन्हा एकदा समांतरचा मुद्दा गाजला. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी निकाली निघत नसल्याबद्दल

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेतही पुन्हा एकदा समांतरचा मुद्दा गाजला. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी निकाली निघत नसल्याबद्दल सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी गोलमोल उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच कंपनीला मनपाने आतापर्यंत किती पैसे दिले याची माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे सदस्य आणखीनच आक्रमक झाले. अखेर कोल्हे यांनी समांतरची कंपनी कामेच करत नाही, मी तरी काय करू, असे हतबल उद्गार काढले. समांतर कंपनीच्या कारभाराबाबत सध्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेतही पडले. नगरसेवक सय्यद मतीन, माधुरी अदवंत, उपमहापौर प्रमोद राठोड, विकास एडके, नंदकुमार घोडेले आदी सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. पाठपुरावा करूनही पाणीपुरवठ्याची कामे होत नसल्यामुळे या सदस्यांनी प्रशासनाला कात्रीत पकडले.दूषित पाणीपुरवठ्याबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. जलकुंभांचे काम तीन दिवसांत सुरू होईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता देतात; परंतु त्यानंतरही काम सुरू होत नाही, असे अनेक मुद्दे सदस्यांकडून उपस्थित करण्यात आले. त्यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी कंपनीला पत्र दिले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोललो आहे, अशी मोघम उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या उत्तरांमुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतरही कोल्हे यांनी कंपनीच काम करीत नसल्याचा राग आळवला. शेवटी सदस्यांनी आम्हाला कंपनीशी देणे घेणे नाही, त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे, आम्ही तुम्हालाच जाब विचारणार, अशी भूूमिका घेतली. अडचणीत आलेल्या कोल्हे यांनी कंपनी काम करीत नाही, म्हणूनच आपण त्यांना नोटीस बजावली आहे, असा खुलासा केला. त्याला उपमहापौर राठोड यांनी आक्षेप घेतला. कंपनीला नोटीस तर आता आयुक्त साहेबांनी दिली आहे. तुम्ही वर्षभर काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याच्या उत्तरात कोल्हे यांनी आपण कंपनीला नोटिसा देत असतो, असे सांगितले. त्यावर महापौर त्र्यंबक तुपे यांनी याआधी तुम्ही कंपनीला किती नोटिसा दिल्या याची माहिती विचारली. त्यानंतर कोल्हे यांनी आपले शब्द मागे घेत याआधी आपण नोटीस नाही, पण वेळोवेळी पत्रे दिली आहेत, असे सांगितले. याच दरम्यान काही सदस्यांनी समांतरला मनपाने आतापर्यंत किती पैसे दिले, याची माहिती विचारली. कोल्हे यांनी ती माहिती देण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळे या विषयावर बराच वेळ चर्चा सुरू राहिली. अखेर महापौरांनी कोल्हे यांना समज देऊन यापुढे कंपनीकडून योग्य पद्धतीने काम करून घ्या, काम होत नसेल तर कारवाई करा, असे आदेश दिले.