शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

अनियमिततेवर समिती सदस्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:26 IST

जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या सदस्यांनी पहिल्याच दिवशी शासनाच्या विविध योजनांमधील कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेवरून जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले़ या समितीच्या सदस्यांना उत्तरे देताना अधिकाºयांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पहावयास मिळाले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या सदस्यांनी पहिल्याच दिवशी शासनाच्या विविध योजनांमधील कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेवरून जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले़ या समितीच्या सदस्यांना उत्तरे देताना अधिकाºयांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पहावयास मिळाले़महाराष्ट्र विधान मंडळाची पंचायतराज समिती बुधवारपासून जिल्हा दौºयावर आली आहे़ आ़ सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पहिल्या दिवशी २५ पैकी १४ आमदार दाखल झाले़ काही आमदार मंगळवारी रात्रीच परभणीत आले होते तर काही आमदार बुधवारी सकाळी शहरात दाखल झाले़ सकाळी १० वाजता शहरातील सावली विश्रामगृह येथे नियोजित कार्यक्रमानुसार स्थानिक आमदारांशी समितीचे सदस्य चर्चा करणार होते़ त्यानुसार चर्चेसाठी जिल्ह्यातील आमदारांपैकी केवळ आ़ विजय भांबळे हेच उपस्थित होते़ यावेळी भांबळे यांनी जि़प़ चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कामकाजातील अनियमिततेचा पाडाच वाचला़ शौचालय उभारणी अंतर्गत त्यांनी नियमबाह्यरित्या वितरित केलेल्या निधी प्रकरणी त्यांना निलंबित करावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली़ खोडवेकर यांची चौकशी पूर्ण होवूनही अद्याप या प्रकरणी कारवाई झालेली नाही़ त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा, असेही भांबळे म्हणाले़ तसेच शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या संदर्भातही त्यांनी तक्रारी केल्या़ गरुड या कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत़ पदाधिकारी, सदस्यांना समाधानकारक उत्तरे देत नाहीत़ शिक्षकांच्या बिंदू नामावलीत व नियुक्त्यांमध्ये त्यांच्या काळात अनियमिता झाली़ ई-लर्निंग अंतर्गत संगणक खरेदीतही गैरप्रकार झाले, अशीही तक्रार यावेळी आ़ भांबळे यांच्यासह काही सदस्यांनी केली़ यावेळी समितीचे प्रमुख आ़ पारवे यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले़ त्यानंतर समितीने जि़प़च्या पदाधिकाºयांशी चर्चा केली़ यावेळी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, उपाध्यक्ष भावनाताई नखाते, राकाँचे गटनेते अजय चौधरी, सभापती श्रीनिवास मुंडे, राधाबाई सूर्यवंशी, उर्मिला बनसोडे, अशोक काकडे आदींची उपस्थिती होती़ यावेळी त्यांनी शिक्षकांच्या रिक्त जागा, अधिकाºयांची रिक्त पदे आदी भरण्याची मागणी केली़ त्यानंतर समितीचे सदस्य सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी दाखल झाले़जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी ७़३० पर्यंत बैठक झाली़ या बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला़ २००८-०९ व २०११-१२ या आर्थिक वर्षातील लेखा परिक्षणातील त्रुटींच्या मुद्यांवर त्यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले़ २०११-१२ मध्ये लघुसिंचन विभागात विविध कामांमध्ये १ कोटी ४१ लाख २७ हजार ४७४ रुपयांची अनियमितता झाल्याबाबत त्यांनी जाब विचारला़ तसेच पाणीपुरवठा विभागात ३ कोटी १० लाख ४५ हजार ५९६ रुपयांची अनियमितता झाल्या प्रकरणातही त्यांनी अधिकाºयांना प्रश्न विचारले़ तसेच बांधकाम विभागात तब्बल ७ कोटी ८५ लाख ८६ हजार ४४८ रुपयांची अनियमितता २०११-१२ या एकाच वर्षात झाल्याबद्दल त्यांनी या विभागाच्या अधिकाºयांनाही धारेवर धरले़शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार, गणवेश वाटप, डेस्क खरेदी आदींमध्ये ४ कोटी ६० लाख ५४ हजार ८१० रुपयांची अनियमितता झाल्या प्रकरणात त्यांनी शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना उत्तरे विचारली़ यावर गरुड यांना उत्तरे देताना नाकी नऊ येत होते़ आरोग्य विभागातील अनियमिततेचा विषयही यावेळी चर्चेला आला़ विषय पत्रिकेत या अनियमितेवर चर्चा झाल्यानंतर अनेक प्रकरणे निकाली काढण्याऐवजी समितीच्या सदस्यांनी संबंधित अधिकाºयांना साक्षीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे अधिकारी चांगलेच घामेघूम झाले होते़