शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनियमिततेवर समिती सदस्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:26 IST

जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या सदस्यांनी पहिल्याच दिवशी शासनाच्या विविध योजनांमधील कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेवरून जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले़ या समितीच्या सदस्यांना उत्तरे देताना अधिकाºयांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पहावयास मिळाले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या सदस्यांनी पहिल्याच दिवशी शासनाच्या विविध योजनांमधील कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेवरून जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले़ या समितीच्या सदस्यांना उत्तरे देताना अधिकाºयांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पहावयास मिळाले़महाराष्ट्र विधान मंडळाची पंचायतराज समिती बुधवारपासून जिल्हा दौºयावर आली आहे़ आ़ सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पहिल्या दिवशी २५ पैकी १४ आमदार दाखल झाले़ काही आमदार मंगळवारी रात्रीच परभणीत आले होते तर काही आमदार बुधवारी सकाळी शहरात दाखल झाले़ सकाळी १० वाजता शहरातील सावली विश्रामगृह येथे नियोजित कार्यक्रमानुसार स्थानिक आमदारांशी समितीचे सदस्य चर्चा करणार होते़ त्यानुसार चर्चेसाठी जिल्ह्यातील आमदारांपैकी केवळ आ़ विजय भांबळे हेच उपस्थित होते़ यावेळी भांबळे यांनी जि़प़ चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कामकाजातील अनियमिततेचा पाडाच वाचला़ शौचालय उभारणी अंतर्गत त्यांनी नियमबाह्यरित्या वितरित केलेल्या निधी प्रकरणी त्यांना निलंबित करावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली़ खोडवेकर यांची चौकशी पूर्ण होवूनही अद्याप या प्रकरणी कारवाई झालेली नाही़ त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा, असेही भांबळे म्हणाले़ तसेच शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या संदर्भातही त्यांनी तक्रारी केल्या़ गरुड या कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत़ पदाधिकारी, सदस्यांना समाधानकारक उत्तरे देत नाहीत़ शिक्षकांच्या बिंदू नामावलीत व नियुक्त्यांमध्ये त्यांच्या काळात अनियमिता झाली़ ई-लर्निंग अंतर्गत संगणक खरेदीतही गैरप्रकार झाले, अशीही तक्रार यावेळी आ़ भांबळे यांच्यासह काही सदस्यांनी केली़ यावेळी समितीचे प्रमुख आ़ पारवे यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले़ त्यानंतर समितीने जि़प़च्या पदाधिकाºयांशी चर्चा केली़ यावेळी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, उपाध्यक्ष भावनाताई नखाते, राकाँचे गटनेते अजय चौधरी, सभापती श्रीनिवास मुंडे, राधाबाई सूर्यवंशी, उर्मिला बनसोडे, अशोक काकडे आदींची उपस्थिती होती़ यावेळी त्यांनी शिक्षकांच्या रिक्त जागा, अधिकाºयांची रिक्त पदे आदी भरण्याची मागणी केली़ त्यानंतर समितीचे सदस्य सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी दाखल झाले़जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी ७़३० पर्यंत बैठक झाली़ या बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला़ २००८-०९ व २०११-१२ या आर्थिक वर्षातील लेखा परिक्षणातील त्रुटींच्या मुद्यांवर त्यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले़ २०११-१२ मध्ये लघुसिंचन विभागात विविध कामांमध्ये १ कोटी ४१ लाख २७ हजार ४७४ रुपयांची अनियमितता झाल्याबाबत त्यांनी जाब विचारला़ तसेच पाणीपुरवठा विभागात ३ कोटी १० लाख ४५ हजार ५९६ रुपयांची अनियमितता झाल्या प्रकरणातही त्यांनी अधिकाºयांना प्रश्न विचारले़ तसेच बांधकाम विभागात तब्बल ७ कोटी ८५ लाख ८६ हजार ४४८ रुपयांची अनियमितता २०११-१२ या एकाच वर्षात झाल्याबद्दल त्यांनी या विभागाच्या अधिकाºयांनाही धारेवर धरले़शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार, गणवेश वाटप, डेस्क खरेदी आदींमध्ये ४ कोटी ६० लाख ५४ हजार ८१० रुपयांची अनियमितता झाल्या प्रकरणात त्यांनी शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना उत्तरे विचारली़ यावर गरुड यांना उत्तरे देताना नाकी नऊ येत होते़ आरोग्य विभागातील अनियमिततेचा विषयही यावेळी चर्चेला आला़ विषय पत्रिकेत या अनियमितेवर चर्चा झाल्यानंतर अनेक प्रकरणे निकाली काढण्याऐवजी समितीच्या सदस्यांनी संबंधित अधिकाºयांना साक्षीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे अधिकारी चांगलेच घामेघूम झाले होते़