शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अनियमिततेवर समिती सदस्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:26 IST

जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या सदस्यांनी पहिल्याच दिवशी शासनाच्या विविध योजनांमधील कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेवरून जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले़ या समितीच्या सदस्यांना उत्तरे देताना अधिकाºयांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पहावयास मिळाले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या सदस्यांनी पहिल्याच दिवशी शासनाच्या विविध योजनांमधील कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेवरून जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले़ या समितीच्या सदस्यांना उत्तरे देताना अधिकाºयांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पहावयास मिळाले़महाराष्ट्र विधान मंडळाची पंचायतराज समिती बुधवारपासून जिल्हा दौºयावर आली आहे़ आ़ सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पहिल्या दिवशी २५ पैकी १४ आमदार दाखल झाले़ काही आमदार मंगळवारी रात्रीच परभणीत आले होते तर काही आमदार बुधवारी सकाळी शहरात दाखल झाले़ सकाळी १० वाजता शहरातील सावली विश्रामगृह येथे नियोजित कार्यक्रमानुसार स्थानिक आमदारांशी समितीचे सदस्य चर्चा करणार होते़ त्यानुसार चर्चेसाठी जिल्ह्यातील आमदारांपैकी केवळ आ़ विजय भांबळे हेच उपस्थित होते़ यावेळी भांबळे यांनी जि़प़ चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कामकाजातील अनियमिततेचा पाडाच वाचला़ शौचालय उभारणी अंतर्गत त्यांनी नियमबाह्यरित्या वितरित केलेल्या निधी प्रकरणी त्यांना निलंबित करावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली़ खोडवेकर यांची चौकशी पूर्ण होवूनही अद्याप या प्रकरणी कारवाई झालेली नाही़ त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा, असेही भांबळे म्हणाले़ तसेच शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या संदर्भातही त्यांनी तक्रारी केल्या़ गरुड या कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत़ पदाधिकारी, सदस्यांना समाधानकारक उत्तरे देत नाहीत़ शिक्षकांच्या बिंदू नामावलीत व नियुक्त्यांमध्ये त्यांच्या काळात अनियमिता झाली़ ई-लर्निंग अंतर्गत संगणक खरेदीतही गैरप्रकार झाले, अशीही तक्रार यावेळी आ़ भांबळे यांच्यासह काही सदस्यांनी केली़ यावेळी समितीचे प्रमुख आ़ पारवे यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले़ त्यानंतर समितीने जि़प़च्या पदाधिकाºयांशी चर्चा केली़ यावेळी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, उपाध्यक्ष भावनाताई नखाते, राकाँचे गटनेते अजय चौधरी, सभापती श्रीनिवास मुंडे, राधाबाई सूर्यवंशी, उर्मिला बनसोडे, अशोक काकडे आदींची उपस्थिती होती़ यावेळी त्यांनी शिक्षकांच्या रिक्त जागा, अधिकाºयांची रिक्त पदे आदी भरण्याची मागणी केली़ त्यानंतर समितीचे सदस्य सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी दाखल झाले़जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी ७़३० पर्यंत बैठक झाली़ या बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला़ २००८-०९ व २०११-१२ या आर्थिक वर्षातील लेखा परिक्षणातील त्रुटींच्या मुद्यांवर त्यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले़ २०११-१२ मध्ये लघुसिंचन विभागात विविध कामांमध्ये १ कोटी ४१ लाख २७ हजार ४७४ रुपयांची अनियमितता झाल्याबाबत त्यांनी जाब विचारला़ तसेच पाणीपुरवठा विभागात ३ कोटी १० लाख ४५ हजार ५९६ रुपयांची अनियमितता झाल्या प्रकरणातही त्यांनी अधिकाºयांना प्रश्न विचारले़ तसेच बांधकाम विभागात तब्बल ७ कोटी ८५ लाख ८६ हजार ४४८ रुपयांची अनियमितता २०११-१२ या एकाच वर्षात झाल्याबद्दल त्यांनी या विभागाच्या अधिकाºयांनाही धारेवर धरले़शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार, गणवेश वाटप, डेस्क खरेदी आदींमध्ये ४ कोटी ६० लाख ५४ हजार ८१० रुपयांची अनियमितता झाल्या प्रकरणात त्यांनी शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना उत्तरे विचारली़ यावर गरुड यांना उत्तरे देताना नाकी नऊ येत होते़ आरोग्य विभागातील अनियमिततेचा विषयही यावेळी चर्चेला आला़ विषय पत्रिकेत या अनियमितेवर चर्चा झाल्यानंतर अनेक प्रकरणे निकाली काढण्याऐवजी समितीच्या सदस्यांनी संबंधित अधिकाºयांना साक्षीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे अधिकारी चांगलेच घामेघूम झाले होते़