शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

‘नांमका’त पाणी सोडण्यास नकार

By admin | Updated: May 22, 2014 00:55 IST

वैजापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्यात पिण्याचे पाणी सोडण्यास नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के. बाफना यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

 वैजापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्यात पिण्याचे पाणी सोडण्यास नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के. बाफना यांनी स्पष्ट नकार दिला आहे. औरंगाबादचे महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी पाणी सोडण्याची कोणतीही मागणी केली नसल्याने पाणी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे बाफना यांनी वैजापूर येथील शिष्टमंडळास सांगितले. दरम्यान, पाणी सोडण्यासंदर्भात औरंगाबादचे महसूल आयुक्त यांनीही बाफना यांच्याशी चर्चा केली; परंतु ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता नांमकाच्या पाण्यावरून नाशिक विरुद्ध औरंगाबाद असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. नांदूर-मधमेश्वर कालव्यातून रबी हंगाम, पिण्यासाठी व उन्हाळी अशी एकूण तीन आवर्तने ३० दिवस सोडण्याचे नियोजन औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत करण्यात आले होते. या तीन आवर्तनाच्या माध्यमातून वैजापूर व गंगापूर तालुक्यासाठी ४३१८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे ठरले होते. त्यानुसार दोन आवर्तने फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात सोडण्यात आली, तर तिसरे आवर्तन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात आले; परंतु तिसरे आवर्तन सोडल्यानंतर नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी साधारणत: १२ दिवसांनंतर कालव्याचे पाणी अचानक बंद केले. पाणी अचानक बंद केल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊन लाभक्षेत्रातील पिके धोक्यात आली. याशिवाय तालुक्यातील जवळपास ३० गावे कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिली. औरंगाबादच्या आयुक्तांनी कालव्यात पाणी सोडण्याचे आदेश दिलेले असतानाही नाशिक पाटबंधारे विभागाच्या अरेरावीच्या धोरणामुळे तालुक्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, रमेश बोरनारे, अविनाश पाटील गलांडे, अंकुश हिंगे, कल्याण जगताप, सतीश खंडागळे, विलास थोरात, प्रभाकर थोरात, गणेश मोटे, रामचंद्र सावंत, राजू पवार, काकासाहेब दुशिंग, अण्णा दुशिंग, सुरेश सातुरे, अमोल पवार, रणजित चव्हाण, भाऊराव बोर्डे, उद्धव बहिरट यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली; मात्र कार्यकारी अभियंता एस.के. बाफना यांनी धरणातच पाणी नाही, तुम्हाला देणार कोठून, असे सांगितल्याने शिष्टमंडळ हतबल झाले. (वार्ताहर)दरम्यानच्या काळात औरंगाबादचे महसूल आयुक्त संजय जैस्वाल यांनी नांमकात पाणी सोडण्याचे आदेश नाशिक पाटबंधारे विभागाला दिले होते. त्यानुसार धरणातून पाणीपुरवठा करणार्‍या भागातील वीजपुरवठा खंडित न केल्याने पाणी सोडण्यास विलंब झाला होता. त्यामुळे पुढील दोन दिवसांत वीज पुरवठा खंडित करून पाणी सोडण्यात येणार असल्याचे नाशिक पाटबंधारे विभागाने १७ मे रोजी सांगितले होते; परंतु विभागीय आयुक्तांच्या आदेशालाही नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी हरताळ फासल्याचे बाबासाहेब जगताप यांनी सांगितले.