शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

‘नांमका’त पाणी सोडण्यास नकार

By admin | Updated: May 22, 2014 00:55 IST

वैजापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्यात पिण्याचे पाणी सोडण्यास नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के. बाफना यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

 वैजापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्यात पिण्याचे पाणी सोडण्यास नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के. बाफना यांनी स्पष्ट नकार दिला आहे. औरंगाबादचे महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी पाणी सोडण्याची कोणतीही मागणी केली नसल्याने पाणी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे बाफना यांनी वैजापूर येथील शिष्टमंडळास सांगितले. दरम्यान, पाणी सोडण्यासंदर्भात औरंगाबादचे महसूल आयुक्त यांनीही बाफना यांच्याशी चर्चा केली; परंतु ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता नांमकाच्या पाण्यावरून नाशिक विरुद्ध औरंगाबाद असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. नांदूर-मधमेश्वर कालव्यातून रबी हंगाम, पिण्यासाठी व उन्हाळी अशी एकूण तीन आवर्तने ३० दिवस सोडण्याचे नियोजन औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत करण्यात आले होते. या तीन आवर्तनाच्या माध्यमातून वैजापूर व गंगापूर तालुक्यासाठी ४३१८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे ठरले होते. त्यानुसार दोन आवर्तने फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात सोडण्यात आली, तर तिसरे आवर्तन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात आले; परंतु तिसरे आवर्तन सोडल्यानंतर नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी साधारणत: १२ दिवसांनंतर कालव्याचे पाणी अचानक बंद केले. पाणी अचानक बंद केल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊन लाभक्षेत्रातील पिके धोक्यात आली. याशिवाय तालुक्यातील जवळपास ३० गावे कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिली. औरंगाबादच्या आयुक्तांनी कालव्यात पाणी सोडण्याचे आदेश दिलेले असतानाही नाशिक पाटबंधारे विभागाच्या अरेरावीच्या धोरणामुळे तालुक्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, रमेश बोरनारे, अविनाश पाटील गलांडे, अंकुश हिंगे, कल्याण जगताप, सतीश खंडागळे, विलास थोरात, प्रभाकर थोरात, गणेश मोटे, रामचंद्र सावंत, राजू पवार, काकासाहेब दुशिंग, अण्णा दुशिंग, सुरेश सातुरे, अमोल पवार, रणजित चव्हाण, भाऊराव बोर्डे, उद्धव बहिरट यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली; मात्र कार्यकारी अभियंता एस.के. बाफना यांनी धरणातच पाणी नाही, तुम्हाला देणार कोठून, असे सांगितल्याने शिष्टमंडळ हतबल झाले. (वार्ताहर)दरम्यानच्या काळात औरंगाबादचे महसूल आयुक्त संजय जैस्वाल यांनी नांमकात पाणी सोडण्याचे आदेश नाशिक पाटबंधारे विभागाला दिले होते. त्यानुसार धरणातून पाणीपुरवठा करणार्‍या भागातील वीजपुरवठा खंडित न केल्याने पाणी सोडण्यास विलंब झाला होता. त्यामुळे पुढील दोन दिवसांत वीज पुरवठा खंडित करून पाणी सोडण्यात येणार असल्याचे नाशिक पाटबंधारे विभागाने १७ मे रोजी सांगितले होते; परंतु विभागीय आयुक्तांच्या आदेशालाही नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी हरताळ फासल्याचे बाबासाहेब जगताप यांनी सांगितले.