शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

मोंढा नाक्यावरील वाहतूक कोंडी लवकर कमी करा

By admin | Updated: September 13, 2014 00:44 IST

औरंगाबाद : सध्या जालना रोडवर सुरू असलेल्या तीन उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़

औरंगाबाद : सध्या जालना रोडवर सुरू असलेल्या तीन उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे मोंढा नाका चौकात तासन्तास वाहतूक खोळंबत असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत़ यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११ वा़ बैठक घेण्यात आली़मोंढा नाका चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना बैठकीत करण्यात आल्या़ यावेळी विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती़ बैठकीत राजेंद्र दर्डा यांनी मोंढा नाका सिग्नलवर वाहतूक तासन्तास खोळंबत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले़ तसेच महत्त्वपूर्ण उपाय सुचवले़ ते म्हणाले की, बांधकामाची गती वाढली पाहिजे, रात्रपाळीत काम केल्यास ते शक्य आहे़ कामाची जागा कमी करून रोडवर लावलेले पत्रे आत घ्यावेत जेणेकरून वाहतुकीसाठी जास्त जागा उपलब्ध होईल, रोडवर ट्रक तसेच इतर वाहने थांबू देऊ नयेत, असेही त्यांनी नमूद केले़ जालना रोडवरील ताण कमी व्हावा यासाठी स्मशान मारुतीकडे जाणारा रस्ता दुरुस्त करण्याची सूचना यावेळी राजेंद्र दर्डा यांनी केली़ वाहतूक पोलिसांनी लाऊडस्पीकरवरून वाहनधारकांना सूचना दिल्यास मोंढा नाक्यावरील वाहतूक सुरळीत होऊ शकते, असेही त्यांनी सूचित केले़विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी पैठण रोड - वाळूज लिंक रोडवरील खड्ड्े बुजविण्याचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश मनपा व सा़बा़ं विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले़ मोंढा नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दुपारी ट्रक व अवजड वाहनांना जालना रोडवरून येण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी सूचना जैस्वाल यांनी वाहतूक पोलिसांना दिली़ सिडको - बसस्टँड ते एपीआय कॉर्नर येथील उड्डाणपुलाचे काम चांगल्या प्रकारे होत असल्याचे सांगत राजेंद्र दर्डा यांनी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विद्युत डीपींकडे सर्वांचे लक्ष वेधले़ या डीपींमुळे अपघात होऊ शकतात़ त्यामुळे डीपी त्वरित हलविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना क़ेली़ त्यासोबतच वाळूज ते पैठण रोडवरील लिंक रोडमुळे होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येसंदर्भात त्यांनी महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या़ स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला़ डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेकडून तातडीने पावले उचलण्यात यायला हवीत, असे राजेंद्र दर्डा म्हणाले़ डेंग्यूची लागण होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले़बैठकीला पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी सैंदाणे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, सा़बां़चे कार्यकारी अभियंता एम़एम़ सिद्दीकी, सा़बां़ विभागाचे अधीक्षक अभियंता आहिरे, मनपा शहर अभियंता सखाराम पानझडे आदींसह मनपा रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन, पोलीस आदी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते़