शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

लाल दिव्यासाठी रस्सीखेच सुरू !

By admin | Updated: March 6, 2017 00:37 IST

बीड : जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीने अध्यक्षपदी मंगल प्रकाश सोळंके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले; परंतु आता काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष व सभापतीपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

बीड : जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीने अध्यक्षपदी मंगल प्रकाश सोळंके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले; परंतु आता काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष व सभापतीपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. तथापि, युद्धात हारलेल्या भाजपने तहात बाजी मारण्याची रणनीती आखून राष्ट्रवादीसमोरील अडचणी वाढविण्यास सुरुवात केली आहे.सर्वाधिक २५ जागा जिंकून राष्ट्रवादी जि.प. मध्ये अग्रस्थानी आहे. काँग्रेसचे तीन सदस्य सोबत घेतले तरीही त्यांना सत्तास्थापनेसाठी आणखी तीन सदस्यांची आवश्यकता आहे. मुंबईत शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत काकू- नाना आघाडीला सोबत घ्यायचे की नाही? यावर तोडगा निघाला नाही. संदीप क्षीरसागर यांची मदत घेण्यास काका आ. जयदत्त क्षीरसागर व जिल्हाप्रमुख डॉ. भारतभूषण क्षीरसागर अनुत्सूक आहेत. याउलट विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात्र आघाडीची मदत घेण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रवादी कोणाच्या मदतीने ‘लाल दिवा’ गाठणार ? याचे कोडे कायम असतानाच आता काँग्रेसने राष्ट्रवादीला ‘हात’भार लावण्याच्या बदल्यात उपाध्यक्ष व सभापतीपदावरही दावा सांगितला आहे. विद्यमान उपाध्यक्षा आशा दौंड यांना आपली खुर्ची यावेळीही शाबूत ठेवायची आहे. दुसरीकडे पहिल्यांदाच मिनीमंत्रालयात पोहोचलेल्या राजेसाहेब देशमुख, प्रदीप मुंडे यांनीही ‘व्हीआयपी पोस्ट’साठी जोरदार लॉबिंंग सुरु केले आहे. त्यामुळे पक्षापुढे पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसमधील दुहीचा फायदा भाजप घेऊ शकते.मुंबई महापालिकेत भाजपने शिवसेनेच्या सोयीचा निर्णय घेतला. त्यामुळे जि. प. मध्ये १९ सदस्य संख्या असलेल्या भाजपला शिवसेनेच्या चार सदस्यांची मदत मिळू शकते. याखेरीज पहिल्याच प्रयत्नात शिवसंग्रामने चार जिंकून आपले स्थान बळकट केले आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे व आ. विनायक मेटे यांची बैठक झाल्याने त्यांच्यातील मतभेद संपुष्टात आल्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. शिवसंग्रामने भाजपला साथ दिल्यास युतीचे संख्याबळ २६ पर्यंत पोहोचणार आहे. भाजपने काकू- नाना आघाडीला गळाला लावल्यास तेही सत्तेच्या समीप पोहोचू शकतात. जि.प. मध्ये पोहोचलेल्या दोन अपक्षांच्या भूमिकेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)