शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

...जीवघेणी ‘भरती’ !

By admin | Updated: November 4, 2014 01:38 IST

बीड : पोलीस भरती असो की सैन्य भरती, प्रत्येक भरती प्रक्रिया आता जीवघेणी ठरत आहे. भरती दरम्यान योग्य सोयी-सुविधा मिळत नसल्यानेच उमेदवारांवर जीव गमवण्याची वेळ येत आहे.

बीड : पोलीस भरती असो की सैन्य भरती, प्रत्येक भरती प्रक्रिया आता जीवघेणी ठरत आहे. भरती दरम्यान योग्य सोयी-सुविधा मिळत नसल्यानेच उमेदवारांवर जीव गमवण्याची वेळ येत आहे. याचे ज्वलंत उदाहरण बीडच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी सैन्य भरतीदरम्यान दिसून आले. यापूर्वीही झालेल्या पोलीस भरती दरम्यान महिला उमेदवाराला चक्कर आली होती.सय्यद जमीर सय्यद बालम (वय २०, रा़ चापडगाव, ता़ कर्जत, जि़ अहमदनगर) या उमेदवाराचा सोमवारी सकाळी वैद्यकीय चाचणी दरम्यान मृत्यू झाला. चार महिन्यापूर्वी याच मैदानावर पोलीस भरती प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना पुरेशा सोयी-सुविधा मिळाल्या नव्हत्या. त्यावेळीही एका महिला उमेदवाराला धावताना चक्कर आली होती. त्या महिलेला तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली. सोमवारीही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी सतर्क राहिले असते तर ‘मिल्ट्रीमॅन’चे स्वप्न उराशी बाळगून भरती प्रक्रियेत उतरलेल्या जमीरचा मृत्यू झाला नसता, अशी चर्चा ऐकावयास मिळाली.चार महिन्यापूर्वी पार पडलेल्या भरतीत अनेक सुविधांचा अभाव होता. सुविधा नसल्यामुळेच उमेदवारांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे उमेवारांमधून नाराजीचा सूर निघत होता. (प्रतिनिधी)पोलीस भरतीदरम्यान बीडमध्ये अनेक महिला, पुरूष उमेदवारांना चक्कर येणे, बेशुद्ध पडणे यासारखे प्रकार घडले होते. ४भर उन्हातही भरती प्रक्रिया घेतली जात असतानाही उमेदवार नोकरीच्या आशेने चाचणी देत होते. कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. ४त्यावेळेस सहन केले आणि आताही सहन केलेल्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आता जीवघेणी ठरू लागली आहे़४यापूर्वी पोलीस भरतीदरम्यान घडलेल्या घटना पाहता सुद्धा प्रशासनाच्या वतीने कसलीच काळजी घेण्यात आली नसल्यानेच सोमवारी जमीरचा मृत्यू झाला, असा आरोप जमीरच्या नातेवाईकांनी केला आहे़