शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

भरती चार वर्षांपासून रखडली

By admin | Updated: February 20, 2015 00:09 IST

वडवणी : मागील चार वर्षांपासून अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस भरती प्रक्रिया रखडली आहे. नवीन सरकार होऊन १०० दिवसांचा कालावधी होऊनही या प्रक्रियेकडे कोणाचे लक्ष नाही

वडवणी : मागील चार वर्षांपासून अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस भरती प्रक्रिया रखडली आहे. नवीन सरकार होऊन १०० दिवसांचा कालावधी होऊनही या प्रक्रियेकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.वडवणी तालुक्यात ९७ अंगणवाड्या कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने २०११ मध्येच तालुक्यातील अनेक गावात अंगणवाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चार वर्षापूर्वीच अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस महिलांची भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. पात्र असणाऱ्या शेकडो महिलांनी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज दाखल केले होते मात्र सदर प्रक्रिया रद्द झाली.त्यानंतर २०१३ मध्ये पुन्हा तालुक्यातील नवीन २९ अंगणवाडी आणि ६ मिनी अंगणवाड्यांसाठी अर्ज मागविण्यात आले. शेकडो लाभाथ्यांनी अर्ज दाखल करून अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस म्हणून दावा केला आहे. मात्र ही निवड प्रक्रिया देखील दोन वर्षांपासून रखडली आहे. ही निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी मागील राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी समिती गठीत केली होती. मात्र प्रशासकीय यंत्रणेने वेळेत काम उरकून समितीपुढे अर्ज ठेवले नसल्याने प्रक्रिया सूत्रांनी सांगितले.मनसे आंदोलनाच्या पावित्र्यातमनसेचे जिल्हा सचिव यशवंत उजगरे यांनी संबंधित विभागाला निवेदन देऊन अधिकाऱ्यांच्या हालगर्जीपणामुळे प्रक्रिया रखडल्याचा आरोप केला असून २० फेब्रुवारीपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)