शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

वसुली थंडावली

By admin | Updated: December 28, 2015 00:23 IST

राजेश खराडे , बीड महावितरणची थकबाकी एक हजार कोटीच्या घरात आहे. बिले अदा करण्याची ग्राहकांची मानसिकताच नसल्याने ग्रहकांना सेवा देण्यास महावितरण अयशस्वी ठरत आहे.

राजेश खराडे , बीडमहावितरणची थकबाकी एक हजार कोटीच्या घरात आहे. बिले अदा करण्याची ग्राहकांची मानसिकताच नसल्याने ग्रहकांना सेवा देण्यास महावितरण अयशस्वी ठरत आहे. महिन्याकाठी सरासरी इतकीही वसुली होत नसल्याने थकबाकीचा आकडा एक हजार कोटी १९ लाख एवढा फुगला आहे.बीले अदा होत नसल्यानेच भारनियमनाची नामुष्की येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे सुरळीत सेवाच मिळत नसल्याचा ग्राहकांचा ठपका आहे. वाढती थकबाकी आणि ग्राहकांना मिळणारी सेवा याचा ताळमेळ लागत नसल्याने सध्या महावितरण कार्यालयाची कोंडी झाली आहे. जिल्ह्यात घरगुती, कृषी, व्यापारी, औद्योगिक, पाणी पुरवठा विभाग, पथदिवे आदी विभगातील ग्रहकांची संख्या दोन लाखांच्या घरात असून थकबाकी एक हजार ६३ कोटी ५२ लाख ऐवढी आहे. अंबाजोगाई व बीड अर्बन वगळता विभगाला महिन्याकाठी सरासरी इतकी वसुली करण्यास यश मिळालेले नाही. वसुलीत अडथळा थकबाकीचा वाढता आकडा हाच ग्रहकांना सेवा देण्यास कारणीभूत ठरत आहे. विज बीलाचे वाटप करण्याचे काम नेमूण दिलेल्या एजन्सी करीत आहेत. वसुलीचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. महिन्याकाठी सर्वाधिक तक्रारी या बिले वेळेवर मिळत नसल्याच्या आहेत. त्यामुळे वसुलीकरिता एक ना अनेक मोहिमा राबवूनही समाधानकारक वसुली होत नाही. एजन्सीकडून नियमित बिलांचे वाटप व बिले अदा करण्याविषयी ग्राहकांनी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पुरवठा विभागाकडून दुजाभावविभागाकडून उत्पन्न तर सोडाच अधिकचा तोटा सहन करावा लागत असल्याने वरिष्ठ कार्यालयाकडून साहित्य पुरविण्यास दुजाभाव केला जात आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात प्रत्येक विभागाला १०० रोहित्रे दिली जातात. असे असतानाही यंदा बीड विभागाला केवळ १० रोहित्रांची बोळवण केली होती. शिवाय गुत्तेदारांचेच पैसे महावितरणकडे असल्याने दोन वर्षापासून लहान-मोठी दुरूस्तीची कामे रखडलेली आहे. साहित्याचा पुरवठा होत नसल्यानेच दुरूस्तीची कामे रखडलेली आहेत. रोहित्रांचा प्रश्न कायमबारमाही रोहित्रांचा प्रश्न कायम राहिलेला आहे. हंगामी काळात विभागाला ४०० रोहित्रांची आवश्यकता होती. तशी मागणीही विभागीय कार्यालयाकडून करण्यात आलेली होती. मात्र वरिष्ठ पातळीवर याची पूर्तता हंगाम संपत आला तरी झालेलीच नाही. त्यामुळे थोड्या-बहूत प्रमाणावर पाणी असतानाही शेतकरी हतबल झाले होेते. रबी हंगामाच्या अंतिम टप्प्यात विभागाला केवळ २० रोहित्रांची बोळवण करण्यात आलेली होती. पोकळ आश्वासने उर्जामंत्र्याच्या आढावा बैठकीत योजना आणि आश्वासंनाचा झालेला पाऊस प्रत्यक्षात मात्र बरसलाच नाही. पंधरा दिवसांत रिक्त पदे भरून दोन दिवसांत २०० रोहित्र देणार असल्याचे उर्जामंंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिनाभरापूर्वी झालेल्या आढावा बैठकीत सांगितले होते. त्यापैकी आठ दिवसांपूर्वी परभणी येथून १० व पुणे विभागाकडून १० अशी २० रोहित्रे देण्यात आलेली आहेत.