शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘त्या’ योजनांची व्याजासह वसुली

By admin | Updated: March 1, 2016 23:52 IST

हिंगोली : जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. डेडलाईन दिल्यानंतरही २२0 पैकी केवळ १0 योजनांमध्येच अंतिम देयके सादर झाली आहेत.

हिंगोली : जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. डेडलाईन दिल्यानंतरही २२0 पैकी केवळ १0 योजनांमध्येच अंतिम देयके सादर झाली आहेत. त्यामुळे आता अनेकांवर कारवाईची गाज पडणार असल्याची चिन्हे आहेत. सहा - सात गावांतील समित्या व अभियंत्यांना यासाठी नोटिसाही दिल्या आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेत रखडलेल्या योजना गतिमान करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अनेक गावांतील समित्यांनी कामांसाठी वाढीव डेडलाईनची मागणी केली होती. ती दिल्यानंतरही या गावांतील योजनांना अद्याप मूर्त रुप आल्याचे चित्र नाही. त्यामुळे आता अशा गावांतील समित्या, संबंधित अभियंते कारवाईच्या कक्षेत येणार आहेत.डेडलाईन संपूनही कामाला न लागलेल्यांची माहिती सादर करण्याचा आदेश प्रभारी कार्यकारी अभियंता के.एम.हिरेमठ यांनी सर्व उपविभागांना दिला आहे. येत्या दोन दिवसांत त्याच्या याद्या प्राप्त होतील. मात्र सध्या सात-आठ योजनांचा अहवाल सादर झाल्याने त्यांना वसूलपात्र रक्कम व्याजासह भरण्याचा आदेश दिला आहे. ही न भरल्यास गुन्हे दाखल करून आरआरसीची प्रकरणेही केली जाणार आहेत. यात कळमनुरी तालुक्यातील चिखली येथे ५.५२ लाख, वसमत तालुक्यातील कोनाथा येथे २.७१ लाख तर भिरडा येथील ६.६0 लाख रुपये वसुलीपात्र रक्कम आहे. कामांचे मूल्यांकन व अदा केलेल्या रक्कमेवरून ही वसुली काढण्यात आली. आता उर्वरित २१0 योजनांचे चित्र लवकरच समोर येणार आहे. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागांनी सक्त धोरण अवलंबण्याचा आदेश सीईओ आर्दड यांनी दिला आहे. त्यामुळे खालची यंत्रणा जोराने कामाला लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)जुन्याच योजना मोठ्या प्रमाणात अडल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठीच जवळपास दहा कोटी लागणार आहेत. शासन या कामांसाठीच निधी देते. नवीन कामांना निधीचा पत्ता नाही. त्यामुळे जिल्ह्याचे नुकसान होत आहे. वारंवार ही बाब निदर्शनास आणूनही पाणीपुरवठा समित्या सुस्तच आहेत. याशिवाय