शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

दोषी असणा-यांकडून करणार वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:50 IST

तब्बल ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणताच आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने चौकशी समिती नेमून झालेले नुकसान दोषींकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण गैरकारभाराला कोण जबाबदार आहे, हे निश्चित करून कारवाई केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तब्बल ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणताच आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने चौकशी समिती नेमून झालेले नुकसान दोषींकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण गैरकारभाराला कोण जबाबदार आहे, हे निश्चित करून कारवाई केली जाणार आहे.शासनाच्या भांडार पडताळणी पथकाने औषधी कालबाह्य झाल्याचा हा प्रकार उघडकीस आणला असून, दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर त्वरित जबाबदारी निश्चित करून शासनाला अनुपालन अहवाल सादर करावा, अशी शिफारस आरोग्य उपसंचालकांना केली आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने २१ नोव्हेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. वृत्त प्रकाशित होताच या प्रकरणात सापडू नये म्हणून अधिकारी-कर्मचाºयांची सारवासारव सुरू झाली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांसाठी शासनाकडून औषधी पुरवठा केला जातो. एकीकडे ३८ कोटी रुपये खर्च करून चिकलठाण्यात भव्य-दिव्य जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत उभी आहे. मागील दोन वर्षांपासून विद्युत विभागाची कामे, नळजोडणी, कर्मचारी भरती, अद्ययावत यंत्रसामग्री खरेदी आदी कारणे सांगून लोकार्पण टाळण्यात येत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील रुग्णालयात औषधींसह विविध आरोग्य सुविधांची वानवा आहे. अशा परिस्थितीत औषधी साठ्यातील ५८ लाख ३८ हजार ६४७ रुपयांची औषधी एक्स्पायर झाली आहे. शासनाच्या भांडार पडताळणी अधिकाºयांच्या पथकाने सामान्य रुग्णालयाच्या भांडार विभागाची चौकशी केली असता हे विदारक सत्य समोर आले. पथकाने त्वरित संपूर्ण औषधीचा पंचनाम केला आहे. ही बाब आरोग्य उपसंचालकांनी गंभीरतेने घेतली आहे. संपूर्ण प्रकरणाचा चौकशी समितीमार्फत पडताळणी करण्यात येत आहे. आॅडिटमध्ये जी बाब समोर आली, तसेच असेल तर दोषींकडून नुकसानीची वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.