शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वसुली कोटींची; मात्र सुविधा शून्य

By admin | Updated: June 19, 2014 00:52 IST

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतींची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतींची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. औरंगाबाद शहराचा घटक बनलेल्या या उपनगरात अनेक समस्याही डोके वर काढत असून, वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायती अपयशी ठरत आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर जमा होतो. अखेर हा निधी जातो तरी कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.एमआयडीसी वाळूजमध्ये नोंदणीकृत उद्योजक एक हजार असले तरी या उद्योजकांवर अवलंबून असलेले आणखी एक ते दीड हजार उद्योजक आहेत. मागील काही वर्षांपासून एमआयडीसी उद्योगांकडून सेवाशुल्क घेत आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर घेते. उद्योजक आणि नागरिकांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये ग्रामपंचायतींना मिळत आहेत; पण त्या तुलनेत नागरिक, उद्योजकांना अत्यंत तुटपुंजा सुविधा मिळत आहेत.रस्ते, पाणी, ड्रेनेज, पथदिवे, आरोग्यसेवाही नागरिकांना मिळत नाहीत. मागील दहा वर्षांपासून या भागातील नागरिक वाळूजला स्वतंत्र नगर परिषद स्थापन करावी, अशी मागणी शासन दरबारी करीत आहेत. मात्र, या मागणीला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. वाळूजनंतर सातारा ग्रामपंचातीने नगर परिषदेची मागणी केली आणि ती मंजूरही झाली. कोट्यवधी रुपयांचा कर ग्रामपंचातींना भरणारे उद्योजक आणि नागरिक आमचा गुन्हा काय? असा प्रश्न विचारत आहेत.वाळूज विविध वसाहतींमध्ये पाणीपुरवठा कधी चार दिवसांनंतर तर कधी आठ दिवसानंतर होतो. तोसुद्धा अत्यंत कमी प्रमाणात. त्यामुळे आबालवृद्धांना पाण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागते. ग्रामपंचायती कर घेतात; पण सुविधा अजिबात देत नाहीत.