शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

‘मघा’च्या रिपरिपीने पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:47 IST

तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात सर्वदूर आगमन करून माना टाकलेल्या पिकांना जीवदान दिले आहे़ शनिवारी ‘मघा’ च्या रिपरिपीने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ नांदेड शहरात सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाची रिमझिम रात्री उशिरापर्यंत सुरूच होती़ जिल्ह्यात अडीच महिन्यात केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून ३१६ मि़ मी़ सरासरी पावसाची नोंद आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात सर्वदूर आगमन करून माना टाकलेल्या पिकांना जीवदान दिले आहे़ शनिवारी ‘मघा’ च्या रिपरिपीने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ नांदेड शहरात सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाची रिमझिम रात्री उशिरापर्यंत सुरूच होती़ जिल्ह्यात अडीच महिन्यात केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून ३१६ मि़ मी़ सरासरी पावसाची नोंद आहे़यंदा मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकºयांनी पेरण्या केल्या परंतु त्यानंतर रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसूू, पुष्य, आश्लेषा हे महत्वाचे नक्षत्र कुचकामी ठरले़ या दरम्यान पाऊस चांगलाच रूसून बसला़ हातचा गेलेला खरीप हंगाम व पिण्याच्या पाण्याचे संकट दारात उभे होते़ त्यामुळे दुष्काळाचे ढग दाटून आले होते़ परंतु हवामान विभागाने दोन दिवसापूर्वी १९ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी होईल, असे भाकीत केले़ आणि या अंदाजाने शेतकºयांना दिलासा मिळाला़ मागील तीन, चार दिवसापासून ढगाळ वातावरण होते़ दाटून आलेले ढग कधी बरसतील, याचीच सर्वांनाच प्रतिक्षा होती़ अखेर शनिवारी सकाळपासून रिमझीम पावसाला सुरूवात झाली़ परंतु दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे अतिवृष्टीचा अंदाजही खोटा ठरला़ आता २३ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी होण्याचे संकेत दिले आहेत़जिल्ह्यात यंदा ८ हजार ५४ हेक्टर पेरणीचे क्षेत्र होते़ त्यापैकी ७ हजार ७६६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ९६़४२ टक्के पेरणी करण्यात आली आहे़ त्यामध्ये १२५२़१६ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य तर १८८०़२६ हेक्टर क्षेत्रावर अन्नधान्य घेण्यात आले आहे़ तर मुख्य पीक असलेल्या कापसाची २ हजार ६९७़७९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे़ पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता़ मात्र आता या रिमझिम पावसाने का होईना पिकांना जीवदान मिळाले आहे़शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते चिखलमय झाले असून हिंगोली गेट परिसरात पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते़ परिणामी हिंगोली गेट उड्डाण पुलाखाली असलेले फुल मार्केट पाण्याखाली गेल्याने फुलविक्रेत्यांची तारांबळ उडाली होती़मृग नक्षत्रात झालेल्या पावसानंतर मोठा पाऊस झाला नाही़ यंदाच्या पावसाळ्यातील दिवसभर पाऊस सुरू राहणारा शनिवार हा पहिला दिवस ठरला आहे़ यापुुर्वी ढगाळवातावरण राहीले़ परंतु, दिवसभर रिपरिप नांदेडकरांना अनुभवायला मिळाली नाही़शुक्रवारी सायंकाळनंतर वातावरणात बदल झाला़ रात्री हलका पाऊसदेखील झाला़ शनिवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण होते़ दरम्यान, सकाळी साडेनऊ वाजेपासून रिमझिम पावसाचे आगमन सुरू झाले़ यानंतर दिवसभर अधुुनमधुन पाऊसाची रिमझिम सुरूच होती़ परंतु, या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले़ अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दिवसभर सुरू राहिलेल्या पावसाचा चाकरमान्यांनी आनंद लुटला़