शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘मघा’च्या रिपरिपीने पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:47 IST

तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात सर्वदूर आगमन करून माना टाकलेल्या पिकांना जीवदान दिले आहे़ शनिवारी ‘मघा’ च्या रिपरिपीने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ नांदेड शहरात सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाची रिमझिम रात्री उशिरापर्यंत सुरूच होती़ जिल्ह्यात अडीच महिन्यात केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून ३१६ मि़ मी़ सरासरी पावसाची नोंद आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात सर्वदूर आगमन करून माना टाकलेल्या पिकांना जीवदान दिले आहे़ शनिवारी ‘मघा’ च्या रिपरिपीने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ नांदेड शहरात सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाची रिमझिम रात्री उशिरापर्यंत सुरूच होती़ जिल्ह्यात अडीच महिन्यात केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून ३१६ मि़ मी़ सरासरी पावसाची नोंद आहे़यंदा मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकºयांनी पेरण्या केल्या परंतु त्यानंतर रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसूू, पुष्य, आश्लेषा हे महत्वाचे नक्षत्र कुचकामी ठरले़ या दरम्यान पाऊस चांगलाच रूसून बसला़ हातचा गेलेला खरीप हंगाम व पिण्याच्या पाण्याचे संकट दारात उभे होते़ त्यामुळे दुष्काळाचे ढग दाटून आले होते़ परंतु हवामान विभागाने दोन दिवसापूर्वी १९ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी होईल, असे भाकीत केले़ आणि या अंदाजाने शेतकºयांना दिलासा मिळाला़ मागील तीन, चार दिवसापासून ढगाळ वातावरण होते़ दाटून आलेले ढग कधी बरसतील, याचीच सर्वांनाच प्रतिक्षा होती़ अखेर शनिवारी सकाळपासून रिमझीम पावसाला सुरूवात झाली़ परंतु दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे अतिवृष्टीचा अंदाजही खोटा ठरला़ आता २३ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी होण्याचे संकेत दिले आहेत़जिल्ह्यात यंदा ८ हजार ५४ हेक्टर पेरणीचे क्षेत्र होते़ त्यापैकी ७ हजार ७६६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ९६़४२ टक्के पेरणी करण्यात आली आहे़ त्यामध्ये १२५२़१६ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य तर १८८०़२६ हेक्टर क्षेत्रावर अन्नधान्य घेण्यात आले आहे़ तर मुख्य पीक असलेल्या कापसाची २ हजार ६९७़७९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे़ पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता़ मात्र आता या रिमझिम पावसाने का होईना पिकांना जीवदान मिळाले आहे़शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते चिखलमय झाले असून हिंगोली गेट परिसरात पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते़ परिणामी हिंगोली गेट उड्डाण पुलाखाली असलेले फुल मार्केट पाण्याखाली गेल्याने फुलविक्रेत्यांची तारांबळ उडाली होती़मृग नक्षत्रात झालेल्या पावसानंतर मोठा पाऊस झाला नाही़ यंदाच्या पावसाळ्यातील दिवसभर पाऊस सुरू राहणारा शनिवार हा पहिला दिवस ठरला आहे़ यापुुर्वी ढगाळवातावरण राहीले़ परंतु, दिवसभर रिपरिप नांदेडकरांना अनुभवायला मिळाली नाही़शुक्रवारी सायंकाळनंतर वातावरणात बदल झाला़ रात्री हलका पाऊसदेखील झाला़ शनिवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण होते़ दरम्यान, सकाळी साडेनऊ वाजेपासून रिमझिम पावसाचे आगमन सुरू झाले़ यानंतर दिवसभर अधुुनमधुन पाऊसाची रिमझिम सुरूच होती़ परंतु, या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले़ अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दिवसभर सुरू राहिलेल्या पावसाचा चाकरमान्यांनी आनंद लुटला़