शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

बँक खात्यावर जमा झालेले अनुदान मिळेना !

By admin | Updated: February 22, 2016 00:40 IST

लातूर : २ लाख ५८ हजार १२७ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०८ कोटी ९१ लाख ७७ हजार रुपयांची रक्कम जमा केली असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले असले,

लातूर : २ लाख ५८ हजार १२७ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०८ कोटी ९१ लाख ७७ हजार रुपयांची रक्कम जमा केली असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले असले, तरी वास्तवात अनेक शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप झाले नाही. बँकेत खेटे मारल्यानंतर अनुदान जमा झाले नसल्याचे बँकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.शासनाने २१० कोटी दुष्काळी अनुदान दिले आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यासह याद्या अद्ययावत करून अनुदान जमा केल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. तालुकानिहाय अनुदान बँकेत जमा केले आहे. मात्र अनेक गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. दररोज बँकांत चकरा मारूनही अनुदान जमा झाले नसल्याचेच उत्तर बँक अधिकाऱ्यांकडूनशेतकऱ्यांना दिले जात आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. खरीपाबरोबर रबी पिकेही गेले आहेत. पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असल्यामुळे २१० कोटींचे अनुदान मिळाले. ते शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केल्याचे सांगण्यात येत असले, तरी औसा तालुक्यातील भादा, भेटा, लातूर तालुक्यातील गंगापूर, भोईसमुद्रगा, जोडजवळा, रेणापूर तालुक्यातीलखरोळा, सेलू जवळगा अशा अनेक गावांतील शेतकऱ्यांनी आम्हाला अनुदान वाटप झाले नसल्याचे सांगितले आहे. दररोज बँकांत जाऊन बँक अधिकाऱ्यांकडून अनुदान जमा झाले नसल्याचेच सांगण्यात येत असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. (प्रतिनिधी)