शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन २० वर्षे झालेच नाही

By admin | Updated: July 1, 2017 23:45 IST

परभणी : शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून प्रत्येक १० वर्षांना नवा कर लावणे अपेक्षित असताना मनपाने सर्वेक्षणच न केल्याने उत्पन्नावर मनपाला पाणी सोडावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून प्रत्येक १० वर्षांना नवा कर लावणे (पुनर्मूल्यांकन) अपेक्षित असताना मनपाने सर्वेक्षणच न केल्याने मागील २० वर्षांपासून लाखो रुपयांच्या उत्पन्नावर मनपाला पाणी सोडावे लागत आहे.परभणी नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाल्यानंतर मनपाचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे पगार उत्पन्नावर भागविणे अपेक्षित होते. मात्र, मनपाचे उत्पन्न कमी असल्याने सुरुवातीचे काही दिवस कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासनाने सहायक अनुदान दिले. मात्र, आता सहायक अनुदान बंद झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारासह शहरातील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी मनपाला आर्थिक गणिते जुळविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी ही दोनच उत्पन्नाची प्रमुख साधने असल्याने हे साधने अधिक बळकट करण्यासाठी मनपाने पावले उचलणे गरजेचे होते. शहरातील वाढीव मालमत्तांची नोंद घेऊन त्या मालमत्तांना कर लावणे अपेक्षित होते. मात्र, मागील २० वर्षांपासून मालमत्तांचे सर्वेक्षणच करण्यात आले नाही. मध्यंतरी सर्वेक्षण करुन पुनर्मूल्यांकन करण्यासाठी लातूर येथील एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. परंतु हे कामही पूर्ण झाले नाही. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाचा प्रश्न वेळोवेळी लटकत राहिला. तब्बल वीस वर्षांपासून मनपाला मालमत्ता करातून जुजबी उत्पन्न मिळत गेले. जो कर लागू आहे तो देखील वेळेत वसूल केला जात नव्हता. त्यामुळे महापालिकेला प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला. बांधकामे वाढत गेली परंतु मनपाचा कर वाढला नाही. मागील वर्षीपासून मनपाने सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. सध्या महानगरपालिकेने मालमत्ता सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. ३० प्रभागांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आणखी ४ प्रभागांचे सर्वेक्षण बाकी आहे. केलेल्या सर्वेक्षणात ५३ हजार ९०० मालमत्तांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी मनपाकडे केवळ ४५ हजार ९६७ मालमत्तांचीच नोंद होती. त्यामुळे सुमारे ८ हजार मालमत्ता नव्याने नोंद झाल्या आहेत. या मालमत्तांच्या मागील २० वर्षांपासूनच्या करावर मनपाला पाणी सोडावे लागले. वेळीच पुनर्मूल्यांकन न झाल्याने परभणी महानगरपालिकेला २० वर्षांपासून आर्थिक संकटालाच सामोरे जावे लागले. (समाप्त)