शहरं
Join us  
Trending Stories
1
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
2
चारवेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
3
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
4
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
5
Piyush Pandey: 'अब की बार, मोदी सरकार', 'हमारा बजाज'सारख्या टॅगलाइनचे जनक, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं निधन; 'पद्मश्री'ने झाला होता गौरव
6
"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."
7
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
8
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
9
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
10
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
11
दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू
12
Australia Squads vs India : ऑस्ट्रेलियन संघात फेरबदल! टीम इंडियाविरुद्ध मॅक्सवेलही उतरणार मैदानात
13
कार्तिक विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत पूजन, गणपती करेल कल्याण-मंगल; पाहा, महत्त्व-मान्यता
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
15
Stock Market Today: शेअर बाजार उघडताच रेड झोनमध्ये; सेन्सेक्स निफ्टीवर फ्लॅट ट्रेडिंग-डिफेन्स शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
17
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
18
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
19
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
20
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम

नवीन महाविद्यालयांची आता खरी सत्वपरीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : विद्यापीठ कार्यक्षेत्रात ४९ नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी शासनाने इरादापत्र दिलेल्या संस्थांपैकी ४७ महाविद्यालयांकडून अंतिम मान्यतेसाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव ...

औरंगाबाद : विद्यापीठ कार्यक्षेत्रात ४९ नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी शासनाने इरादापत्र दिलेल्या संस्थांपैकी ४७ महाविद्यालयांकडून अंतिम मान्यतेसाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव आले आहेत. त्यानुसार इरादापत्रात नमूद केल्याप्रमाणे या नवीन महाविद्यालयांकडे तेवढी जागा, सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्राचार्यांचा कक्ष आदी तंतोतंत अद्ययावत भौतिक सुविधा उपलब्ध आहेत का, याची पाहणी आता समित्या प्रत्यक्ष ‘स्पॉट’वर जाऊन करतील. एवढेच नाही, तर पाहणी अहवालासोबत भौतिक सुविधांचे चित्रीकरणदेखील या समित्यांना विद्यापीठ प्रशासनाकडे सादर करावे लागणार आहे.

नवीन महाविद्यालयांच्या इरादापत्राची मुदत ३१ जानेवारी २०२२ पर्यंतची आहे. तत्पूर्वी या महाविद्यालयांना अंतिम मान्यता मिळवावी लागणार आहे. त्यासाठी शासनाकडे नवीन महाविद्यालयांच्या मान्यतेसाठी संस्थांनी दिलेल्या प्रस्तावांसोबत आवश्यक भौतिक सुविधांबाबतची माहिती शपथपत्राद्वारे दिलेली आहे. त्यानुसार आता विद्यापीठांमार्फत समित्या पाठवून त्याची खातरजमा केली जाणार आहे. विशेष म्हणजे, भौतिक सुविधांबाबत विद्यापीठाने शासनाला चुकीचा अहवाल सादर केला, तर संबंधित विद्यापीठाच्या प्रकुलगुरुंना जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून भौतिक सुविधांची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे.

प्रत्यक्ष पाहणीनंतर समित्यांकडून भौतिक सुविधांचा अहवाल अगोदर कुलगुरुंकडे सादर केला जाईल. कुलगुरुंच्या सूचनेनुसार अधिष्ठाता मंडळाकडून त्या अहवालांची पडताळणी होईल. नवीन महाविद्यालयांकडे काही भौतिक सुविधा अपूर्ण असतील, तर अधिष्ठाता मंडळाकडून संबंधित महाविद्यालयाच्या प्रस्तावावर तसे स्पष्टपणे नमूद केले जाईल. त्यानंतर तो अहवाल व्यवस्थापन परिषदेसमोर जाईल. व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर तो शासनाला सादर केला जाईल. अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच संबंधित महाविद्यालयांना विद्यापीठाकडे प्रथम संलग्नीकरणासाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे.

चौकट.....

लॉकडाऊननंतर लगेच तपासणी

यासंदर्भात विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले की, नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी संस्थांनी भौतिक सुविधांबाबतचा अनुपालन अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. त्यानुसार समित्यांमार्फत त्याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन खातरजमा केली जाईल. त्यानंतर या महाविद्यालयांच्या अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविले जातील. लॉकडाऊन उघडल्यानंतर लगेच समित्या संबंधित महाविद्यालयांच्या ठिकाणी पाठविण्यात येतील.