शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नवीन महाविद्यालयांची आता खरी सत्वपरीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : विद्यापीठ कार्यक्षेत्रात ४९ नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी शासनाने इरादापत्र दिलेल्या संस्थांपैकी ४७ महाविद्यालयांकडून अंतिम मान्यतेसाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव ...

औरंगाबाद : विद्यापीठ कार्यक्षेत्रात ४९ नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी शासनाने इरादापत्र दिलेल्या संस्थांपैकी ४७ महाविद्यालयांकडून अंतिम मान्यतेसाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव आले आहेत. त्यानुसार इरादापत्रात नमूद केल्याप्रमाणे या नवीन महाविद्यालयांकडे तेवढी जागा, सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्राचार्यांचा कक्ष आदी तंतोतंत अद्ययावत भौतिक सुविधा उपलब्ध आहेत का, याची पाहणी आता समित्या प्रत्यक्ष ‘स्पॉट’वर जाऊन करतील. एवढेच नाही, तर पाहणी अहवालासोबत भौतिक सुविधांचे चित्रीकरणदेखील या समित्यांना विद्यापीठ प्रशासनाकडे सादर करावे लागणार आहे.

नवीन महाविद्यालयांच्या इरादापत्राची मुदत ३१ जानेवारी २०२२ पर्यंतची आहे. तत्पूर्वी या महाविद्यालयांना अंतिम मान्यता मिळवावी लागणार आहे. त्यासाठी शासनाकडे नवीन महाविद्यालयांच्या मान्यतेसाठी संस्थांनी दिलेल्या प्रस्तावांसोबत आवश्यक भौतिक सुविधांबाबतची माहिती शपथपत्राद्वारे दिलेली आहे. त्यानुसार आता विद्यापीठांमार्फत समित्या पाठवून त्याची खातरजमा केली जाणार आहे. विशेष म्हणजे, भौतिक सुविधांबाबत विद्यापीठाने शासनाला चुकीचा अहवाल सादर केला, तर संबंधित विद्यापीठाच्या प्रकुलगुरुंना जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून भौतिक सुविधांची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे.

प्रत्यक्ष पाहणीनंतर समित्यांकडून भौतिक सुविधांचा अहवाल अगोदर कुलगुरुंकडे सादर केला जाईल. कुलगुरुंच्या सूचनेनुसार अधिष्ठाता मंडळाकडून त्या अहवालांची पडताळणी होईल. नवीन महाविद्यालयांकडे काही भौतिक सुविधा अपूर्ण असतील, तर अधिष्ठाता मंडळाकडून संबंधित महाविद्यालयाच्या प्रस्तावावर तसे स्पष्टपणे नमूद केले जाईल. त्यानंतर तो अहवाल व्यवस्थापन परिषदेसमोर जाईल. व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर तो शासनाला सादर केला जाईल. अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच संबंधित महाविद्यालयांना विद्यापीठाकडे प्रथम संलग्नीकरणासाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे.

चौकट.....

लॉकडाऊननंतर लगेच तपासणी

यासंदर्भात विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले की, नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी संस्थांनी भौतिक सुविधांबाबतचा अनुपालन अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. त्यानुसार समित्यांमार्फत त्याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन खातरजमा केली जाईल. त्यानंतर या महाविद्यालयांच्या अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविले जातील. लॉकडाऊन उघडल्यानंतर लगेच समित्या संबंधित महाविद्यालयांच्या ठिकाणी पाठविण्यात येतील.