शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘जनता खाना’ जनतेपर्यंत पोहोचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:26 IST

: रेल्वेस्टेशनवर महागडे खाद्यपदार्थ विकत न घेऊ शकणा-या प्रवाशांसाठी अवघ्या १५ रुपयांत जेवण जनता खानाद्वारे पुरविण्यात येते; परंतु रेल्वेस्टेशनवर ‘जनता खाना’ची माहिती अगदी सहजपणे मिळत नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करून महागडे पदार्थ घेण्याची वेळ अनेक सर्वसामान्य प्रवाशांवर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रेल्वेस्टेशनवर महागडे खाद्यपदार्थ विकत न घेऊ शकणा-या प्रवाशांसाठी अवघ्या १५ रुपयांत जेवण जनता खानाद्वारे पुरविण्यात येते; परंतु रेल्वेस्टेशनवर ‘जनता खाना’ची माहिती अगदी सहजपणे मिळत नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करून महागडे पदार्थ घेण्याची वेळ अनेक सर्वसामान्य प्रवाशांवर येत आहे.मॉडेल रेल्वेस्टेशनवर प्रवाशांच्या सुविधेसाठी कॅन्टीन, फूडप्लाझा आहे. सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १५ रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ‘जनता खाना’ ही योजना सुरू केली. अवघ्या १५ रुपयांत सात पुºया, बटाट्याची भाजी, लोणचे असा मेनू दिला जातो. एका प्रवाशाचे जेवण या जनता खानात सहज होते; परंतु ‘जनता खाना’ या सुविधेची लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातआहे.जनता खाना उपलब्ध असल्याची माहिती दर्शनी भागात लावली जात नाही. कधीतरी आणि कुठेतरी कोप-यात फलक दिसतो. तो प्रवाशांना सहज दिसतही नाही. जे प्रवासी मागतील, त्यांनाच जनता खाना देण्याचा कल दिसतो.जनता खाना उपलब्ध असल्याची कल्पना मिळत नसल्याने खिशाला ताण देऊन महागडे भोजन विकत घेण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. जनता खाना मागितल्यावर नसल्याचेही अनेकदा सांगितलेजाते. प्रवाशांपर्यंत जनता खाना पोहोचत नसल्याने ते ‘बेचव’ होत आहे.अधिकारी म्हणतात...रेल्वेस्टेशनवरील संबंधित अधिका-यांना विचारले असताना ते म्हणाले, ‘जनता खाना’चा प्रचार-प्रसार रेल्वेच्या संकेतस्थळावरून केला जातो. प्रवाशांना त्याविषयी माहिती मिळते. रेल्वेस्टेशनवर मागणी करणाºया प्रवाशांना जनता खाना दिला जातो. यासंदर्भात फलक लावावा, हे बंधनकारक नाही.