शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग

By admin | Updated: August 9, 2015 00:30 IST

रत्नागिरी ते नागपूर या लातूरमार्गे जाणाऱ्या बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने

दत्ता थोरे , लातूररत्नागिरी ते नागपूर या लातूरमार्गे जाणाऱ्या बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या महामार्गाच्या कामाची ‘थ्री स्मॉल ए’ ची अधिसूचना काढली असून सक्षम प्राधिकारीपदी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय २०१४ ला ‘टू लेन’ घोषित झालेला हा मार्ग आता नव्या अधिसूचनेनुसार ‘फोर लेन’ करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातून रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित होता. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या कामाच्या फक्त चर्चाच व्हायच्या. मुहूर्तच लागत नसलेल्या या कामाला या जूनपासून वेग आला आहे. नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत असलेल्या या खात्यातून हे काम होणार असून या मार्गाच्या भूसंपादनासाठी ‘थ्री स्मॉल ए’ ची अधिसूचना जूनच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे.लातूर जिल्ह्यातून जेवढा मार्ग जातो, तेवढ्या मार्गासाठी जमीनीचे भूसंपादन करावयासाठी खास अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़ एसडीसो शोभा जाधव यांच्याकडे याच्या सक्षम प्राधिकारीपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. सक्षम प्राधिकारीच्या नियुक्तीनंतर ते आता उस्मानाबाद-लातूरच्या सिमेवरील उजनीपासून ते लातूर-नांदेडच्या सीमेवरील रूईपर्यंतच्या जिल्ह्याच्या हद्दीतील किती जमीन लागेल याचा अभ्यास करणार आहे. या मार्गातील येणाऱ्या लातूर जिल्ह्यातील ८५ गावातील आवश्यक जमिनीची संयुक्त मोजणी करुन घेतील. शेती किती जाते ? जागा किती लागते ? फळपिके किती आहेत ? घरे किती आहेत ? त्यांच्या किमतीसह मावेजा ठरविण्यात येणार आहे. अंदाजे या वर्षभरात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातील उजनीपासून त्यांना एक वर्षात या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार आम्ही आता नेमकी किती गावे येणार आहेत ? रस्त्यासाठी किती जमीन लागणार आहे ? किती शेतकरी आहेत ? त्यांना किती मावेजा द्यावा लागणार आहे ? याची माहिती संकलित करीत आहोत. पूर्ण माहिती संकलित झाल्यानंतर ती केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे पाठविण्यात येईल. त्यानुसार मावेजाचे आदेश निघून त्याचे भूसंपादन करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राष्ट्रीय महामार्गासाठी निघणाऱ्या भूसंपादनाच्या अधिसूचना या ‘थ्री स्मॉल ए’, ‘थ्री कॅपिटल ए’, ‘थ्री डी’ आणि ‘अवॉर्ड’ अशा चार टप्प्यात केल्या जातात. ‘थ्री स्मॉल ए’मध्ये सक्षम प्राधिकारी नियुक्त केला जातो. ‘थ्री कॅपिटल ए’ मध्ये ज्या सर्व्हे नंबरचे भूखंड ताब्यात घ्यावयाचे आहेत त्याचे नंबर घेऊन ते शासनाला कळविले जातात. ही अधिसूचना आता निघायच्या मार्गावर आहे. त्यानंतर ‘थ्रीडी’ मध्ये सर्व्हे नंबरच्या व्यक्तींची नावे घोषित केली जातात आणि ‘अवॉर्ड’ या शेवटच्या टप्प्यात बाधितांना मावेजा दिला जातो. २०१३ च्या भूसंपादन कायद्यान्वये मावेजा मिळणार आहे़राष्ट्रीय महामार्ग ३६१ हा जरी रत्नागिरी ते नागपूर असला तरी सोलापूरपर्यंत एन. एच. ९ हा फोर लेन रस्ता आला आहे. २११ क्रमांकाचा सोलापूर ते धुळे या महामार्गाच्या फोर लेनचे काम सुरु आहे. आता फक्त तुळजापूर ते नागपूर या मार्गावरच फोर लेनचे काम करावे लागणार आहे.