शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग

By admin | Updated: August 9, 2015 00:30 IST

रत्नागिरी ते नागपूर या लातूरमार्गे जाणाऱ्या बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने

दत्ता थोरे , लातूररत्नागिरी ते नागपूर या लातूरमार्गे जाणाऱ्या बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या महामार्गाच्या कामाची ‘थ्री स्मॉल ए’ ची अधिसूचना काढली असून सक्षम प्राधिकारीपदी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय २०१४ ला ‘टू लेन’ घोषित झालेला हा मार्ग आता नव्या अधिसूचनेनुसार ‘फोर लेन’ करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातून रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित होता. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या कामाच्या फक्त चर्चाच व्हायच्या. मुहूर्तच लागत नसलेल्या या कामाला या जूनपासून वेग आला आहे. नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत असलेल्या या खात्यातून हे काम होणार असून या मार्गाच्या भूसंपादनासाठी ‘थ्री स्मॉल ए’ ची अधिसूचना जूनच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे.लातूर जिल्ह्यातून जेवढा मार्ग जातो, तेवढ्या मार्गासाठी जमीनीचे भूसंपादन करावयासाठी खास अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़ एसडीसो शोभा जाधव यांच्याकडे याच्या सक्षम प्राधिकारीपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. सक्षम प्राधिकारीच्या नियुक्तीनंतर ते आता उस्मानाबाद-लातूरच्या सिमेवरील उजनीपासून ते लातूर-नांदेडच्या सीमेवरील रूईपर्यंतच्या जिल्ह्याच्या हद्दीतील किती जमीन लागेल याचा अभ्यास करणार आहे. या मार्गातील येणाऱ्या लातूर जिल्ह्यातील ८५ गावातील आवश्यक जमिनीची संयुक्त मोजणी करुन घेतील. शेती किती जाते ? जागा किती लागते ? फळपिके किती आहेत ? घरे किती आहेत ? त्यांच्या किमतीसह मावेजा ठरविण्यात येणार आहे. अंदाजे या वर्षभरात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातील उजनीपासून त्यांना एक वर्षात या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार आम्ही आता नेमकी किती गावे येणार आहेत ? रस्त्यासाठी किती जमीन लागणार आहे ? किती शेतकरी आहेत ? त्यांना किती मावेजा द्यावा लागणार आहे ? याची माहिती संकलित करीत आहोत. पूर्ण माहिती संकलित झाल्यानंतर ती केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे पाठविण्यात येईल. त्यानुसार मावेजाचे आदेश निघून त्याचे भूसंपादन करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राष्ट्रीय महामार्गासाठी निघणाऱ्या भूसंपादनाच्या अधिसूचना या ‘थ्री स्मॉल ए’, ‘थ्री कॅपिटल ए’, ‘थ्री डी’ आणि ‘अवॉर्ड’ अशा चार टप्प्यात केल्या जातात. ‘थ्री स्मॉल ए’मध्ये सक्षम प्राधिकारी नियुक्त केला जातो. ‘थ्री कॅपिटल ए’ मध्ये ज्या सर्व्हे नंबरचे भूखंड ताब्यात घ्यावयाचे आहेत त्याचे नंबर घेऊन ते शासनाला कळविले जातात. ही अधिसूचना आता निघायच्या मार्गावर आहे. त्यानंतर ‘थ्रीडी’ मध्ये सर्व्हे नंबरच्या व्यक्तींची नावे घोषित केली जातात आणि ‘अवॉर्ड’ या शेवटच्या टप्प्यात बाधितांना मावेजा दिला जातो. २०१३ च्या भूसंपादन कायद्यान्वये मावेजा मिळणार आहे़राष्ट्रीय महामार्ग ३६१ हा जरी रत्नागिरी ते नागपूर असला तरी सोलापूरपर्यंत एन. एच. ९ हा फोर लेन रस्ता आला आहे. २११ क्रमांकाचा सोलापूर ते धुळे या महामार्गाच्या फोर लेनचे काम सुरु आहे. आता फक्त तुळजापूर ते नागपूर या मार्गावरच फोर लेनचे काम करावे लागणार आहे.