शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित

By admin | Updated: June 10, 2014 00:33 IST

कडा: आष्टी तालुक्यातील अनेक ठिकाणी शिधापत्रिकाधारकांना वेळेवर व पुरेसे धान्य मिळत नाही. यामुळे शिधापत्रिकाधारकांना हक्काच्या धान्यापासून वंचित रहावे लागते.

कडा: आष्टी तालुक्यातील अनेक ठिकाणी शिधापत्रिकाधारकांना वेळेवर व पुरेसे धान्य मिळत नाही. यामुळे शिधापत्रिकाधारकांना हक्काच्या धान्यापासून वंचित रहावे लागते. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धान्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप शिधापत्रिकाधारकातून होत आहे. आष्टी तालुक्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना पिवळ्या शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत. या कुटुंबियांना अल्प किमतीत गहू, तांदूळ हे धान्य देण्यात येते. धान्यापासून कोणीही वंचित राहू नये, योग्य किमतीत धान्य मिळावे, शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य मिळावे व धान्याचा काळा बाजार होऊ नये, यासाठी वरिष्ठांकडून सातत्याने सूचना देण्यात येतात. असे असले तरी तालुक्यात सध्या धान्य वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.अनेक ठिकाणी शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य मिळत नाही. धान्याची चढ्या दराने विक्री होते. कार्डधारकांना पुरेसे धान्य मिळत नाही, असे प्रकार तालुक्यात सर्रास होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी केला आहे. अनेक ठिकाणी धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी कार्डधारकातून केल्या जातात. मात्र संबंधित दुकानदारांना पुरवठा विभागाचा वरदहस्त असल्याने केवळ कागदी घोडे नाचविले जात असल्याचेही जगताप यांनी सांगितले.तालुक्यातील दौला वडगाव हे आठ हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावाजवळ काही वाड्या व वस्त्या आहेत. या ठिकाणच्या सर्व ग्रामस्थांना धान्य मिळावे यासाठी तीन दुकाने उघडली आहेत. असे असले तरी या दुकानातून मिळणारे धान्य शिधापत्रिका धारकांना मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थातून होत आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकांना नाईलाजाने खुल्या बाजारातून चढ्या किमतीने धान्य खरेदी करावे लागत असल्याचे बाळासाहेब कोटक यांनी सांगितले. तसेच येथील काही दुकानदार कार्डधारकांना अपमानास्पद वागणूक देतात. अनेकदा पुरेसे धान्यही दिले जात नसल्याचा आरोप शिधापत्रिकाधारकातून होत आहे. यामुळे सदरील दुकानदारांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी आयुब खान, महादेव थोरात, सोमनाथ भापकर, नाना जाधव, संभाजी मगर, अण्णा पिसोरे, रामदास पिसोरे यांच्यासह इतर शिधापत्रिका धारकांनी केली आहे.या संदर्भात आष्टी येथील तहसीलदार राजीव शिंदे म्हणाले की, तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत आहे. शिधापत्रिकांना धान्य मिळते का नाही याचीही शहानिशा करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळावे यासाठी पुरवठा विभाग योग्य ती काळजी घेत आहे. या उपरही लाभार्थ्यांना धान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी आल्यास तेथे चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.