शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

फळ-भाज्यांमध्ये वाढले पेस्टीससाईडसचे प्रमाण

By admin | Updated: September 1, 2014 00:24 IST

नांदेड: देशातील लोकसंख्या वेगाने वाढल्याने अन्नाचे उत्पादन वाढविणे क्रमप्राप्त झले़ त्यासाठी बियाणांना हायब्रिड करण्याचा प्रयत्न झाला़

नांदेड: देशातील लोकसंख्या वेगाने वाढल्याने अन्नाचे उत्पादन वाढविणे क्रमप्राप्त झले़ त्यासाठी बियाणांना हायब्रिड करण्याचा प्रयत्न झाला़ अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची मागणी वाढल्याने देश व परदेशातील अनेक कंपन्यांत चढाओढ निर्माण झाली़ नवीन वाण बाजारात आले त्याचे उत्पादन विक्रमी झाले़ यातच वातावरणाने कुस बदलल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढला़ हायब्रिड वाणात रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाऊ लागली़ आता तर विषाक्त फवारणीची सवयच जडली असून रोज आपण बाजारातून घरी आणलेली भाजी आणि फळेही विषाक्त होत आहेत़ याचे दुष्परिणाम आता ठळकपणे दिसायला लागले आहेत़ त्यामुळेच आधी सर्व पिकांवर फावरणी करा, असा प्रचार करणारे वैज्ञानिकही आता पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशक मानवासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत आहेत़आजारांचे प्रमाण वाढलेशहरांचा गतीने विकास होत गेला़ या वाढत्या शहराची भूक भागवण्यिाची जबाबदारी शेतकऱ्यांवर आली़ यातून मिळणारा अधिकाधिक फायदा दिसून लागल्याने उत्पादनवाढीची कसरत सुरु झाली़ खेड्यावरुन येणाऱ्या भाजीपाल्याची क्रेझ वाढली़ परंतु हा भाजीपाला शहरी बाजारात टिकवून ठेवण्यासाठी रसायनांची मदत घेतली जाऊ लागली़ परिणामी शहरात आजराचे प्रमाण वाढत गेले़आता आॅरगॅनिक शेतीरसायनांचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर कमी कीटकनाशके वापरुन अधिक फायदा व्हावा या संकल्पनेतून सेंद्रिय शेतीची पद्धत पुढे आली़ आता सेंद्रिय खतांचा वापर वाढवा, यासाठी प्रयत्न सुरु आहे़ परंतु या खतामुळे होणारे फायदे आणि त्या संदर्भातील तंत्रज्ञान अद्यापही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत़ सेंद्रिय शेती म्हणजे काय संकल्पना आहे याची जाणीव करुन देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे़कृषी संशोधनावर दरवर्षी कोट्यवधीचा खर्च होतो़ परंतु यातून होणारे संशोधन, त्याचे फायदे व तोटे सांगण्याची गरज कुणालाच वाटत नाही़ काही वर्षात कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर वाढला़ हायब्रिड बियाणामुळेही समस्या निर्माण झाल्या़ जमिनीचा कस कमी झाला़ आता तर मानवी शरीरात कीटकांना संपविणाऱ्या रसायनांचा स्तर वाढल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत़ (प्रतिनिधी)