शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

‘आरएसएसप्रणीत भाजपचे मनुवादी सरकार पुन्हा नको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:46 IST

आरएसएसप्रणीत भाजपचे मनुवादी सरकार देशात पुन्हा नको हीच आमची स्पष्ट भूमिका असून, आम्ही काँग्रेससोबत असल्याचे आज येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्टÑीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी जाहीर केले.

ठळक मुद्दे जोगेंद्र कवाडे : काँग्रेसकडे सहा जागांची केली मागणी

औरंगाबाद : आरएसएसप्रणीत भाजपचे मनुवादी सरकार देशात पुन्हा नको हीच आमची स्पष्ट भूमिका असून, आम्ही काँग्रेससोबत असल्याचे आज येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्टÑीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी जाहीर केले.ते दुपारी सुभेदारी गेस्ट हाऊसवर पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. त्यांनी सांगितले की, आमच्या पक्षाची आघाडी काँग्रेससोबत आहे. आम्ही काँग्रेसकडे लोकसभेच्या सहा जागांची मागणीही केली आहे. सध्या त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. विदर्भातील चार, मराठवाड्यातून एक व उत्तर महाराष्टÑातून एक जागा मिळावी, अशी आमची मागणी आहे.रिपब्लिकनांना वंचित ठेवलं जातंय.. चौकट....वंचित आघाडीचा प्रयोग यापूर्वी हाजी मस्तान यांच्यासमवेत आम्ही केला होता. आताच्या वंचित आघाडीतून रिपब्लिकनांनाच वंचित ठेवलं जातंय. बाळासाहेब आंबेडकर यांना नक्षलवादी, माओवादी, कम्युनिस्ट ते एमआयएम सारे चालतात. पण रिपब्लिकन पक्ष मात्र चालत नाही. रिपब्लिकन ऐक्यासाठी बाळासाहेबांनी पुढाकार तर घेऊन पाहावं! चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला.उद्धव ठाकरे आरत्या करीत फिरत आहेत. त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत. लोकशाहीची, समतेची, बंधुतेची पूजा करावी लागते. ती आम्ही करतो, असा टोला कवाडे यांनी लगावला. हनुमानाची जात काय काढता? पूर्वी असं कधी घडत नव्हतं. देवाच्या जाती काढून त्यावर चर्चा करणारे लोक ढोंगी असून, त्यापेक्षा जातिव्यवस्था संपविण्यासंबंधीची चिकित्सा झाली पाहिजे, यावर कवाडे यांनी भर दिला.१९८१ पासून मी दरवर्षी भीमा कोरेगावला जातो. शौर्य दिनाची सुरुवातच आम्ही केली. यावर्षीही मी भीमा कोरेगावला जाणार. सभा घेण्यासाठी आम्हाला अद्याप तरी परवानगी मिळालेली नाही. पण यावर्षी गतवर्षाप्रमाणे भीमा कोरेगावला काही गडबड होईल, असे वाटत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अंबानी मार्गे पैसा मिळावा यासाठी पंतप्रधानांनी केलेला घोटाळा म्हणजे राफेल घोटाळा होय, अशी टीका करीत कवाडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी हे बॅरिस्टर आहेत. त्यांची भाषणे मी ऐकली आहेत. त्यावरून संविधानावर त्यांचा विश्वास आहे, असे मला वाटते.गोपाळराव आटोटे, अ‍ॅड. जे. के. नारायणे, गणेश पडघन, अ‍ॅड. सोनाली अहिरे, अशोक जाधव, सागर कुलकर्णी, लक्ष्मण कांबळे, विजया दाभाडे, राजू जाधव, शेषराव सातपुते, प्रकाश जाधव, जालिंदर इंगोले आदींची यावेळी उपस्थिती होती.----------------

टॅग्स :PoliticsराजकारणJogendra kawadeजोगेंद्र कवाडे