शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

रेशनच्या तूरडाळीला महागाईचा तडका !

By admin | Updated: October 12, 2016 23:25 IST

बाळासाहेब जाधव लातूर जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानात येणाऱ्या तूरडाळीचा भाव १०३ रुपये किलोवर गेला आहे.

बाळासाहेब जाधव लातूरजिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानात येणाऱ्या तूरडाळीचा भाव १०३ रुपये किलोवर गेला आहे. तर त्याच डाळीचा बाजारातील भाव ८० रुपये किलो आहे. बाजार भावापेक्षा स्वस्त धान्य दुकानातील तूरडाळ प्रति किलो २३ रुपयांनी महाग आहे. त्यामुळे तूरडाळीसाठी स्वस्त धान्य दुकानांकडे कार्डधारकांनी पाठ फिरविली आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात रेशनच्या धान्यांचा कोटाच जिल्ह्याला मिळाला नसल्याने रेशन दुकानदार चिंतेत आहेत.लातूर जिल्ह्यातील बीपीएलच्या ८६ हजार २२४, अन्त्योदयच्या ४१ हजार १६२, केशरी शिधापत्रिकाधारक ३ लाख २६ हजार ५०४, तर अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांची संख्या १८३२ तर शुभ्र शिधापत्रिकाधारकांची संख्या १८ हजार ४९२ अशा एकूण ४ लाख ७४ हजार ८१४ एवढी संख्या शिधापत्रिकाधारकांची आहे. एकूण शिधापत्रिकाधारकांपैकी १ लाख २८ हजार नागरिक अन्त्योदय व बीपीएलचे लाभधारक आहेत. या लाभधारकांसाठी तूरडाळीचा १२८० क्विंटलचा स्टॉक आॅगस्टमध्ये आला. परंतु, स्वस्त धान्य दुकानातील तूरडाळीचा भाव १०३ रुपये प्रति किलो तर बाजारातील तूरडाळीचा भाव ८० रुपये किलो आहे. या दोन्ही भावामध्ये २३ रुपयांची तफावत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने बहुतांश तूरडाळ स्वस्तधान्य दुकानदारांकडे पडून राहिली. तर बाजारातील तूरडाळ २३ रुपये कमी दराने मिळत असल्याने बाजारातील तूरडाळीला प्राधान्य दिले असल्याने १३५० स्वस्तधान्य दुकानांतील तूरडाळ दुकानातच पडून राहिली. याबाबत पुरवठा विभागाने नागरिकांच्या तक्रारींबाबत शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु, स्वस्त धान्य दुकानातील तूरडाळीच्या दराबाबत कुठलेही लेखी पत्र शासनाकडून अद्यापपर्यंत आले नसल्याने पुरवठा विभागानेही तूरडाळीची नंतर मागणीच केली नाही. परिणामी, स्वस्त धान्यातून मिळणाऱ्या डाळीला महागाईची किनार मिळाल्याने नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानातील डाळींकडे पाठ फिरविली आहे.