शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सातारा-देवळाईत भूजल पातळीमध्ये झपाट्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:04 IST

बोअरवेलला मुबलक पाणी: मनपा टँकरच्या फेऱ्या झाल्या कमी -साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सातारा-देवळाई परिसरातील भूजल ...

बोअरवेलला मुबलक पाणी: मनपा टँकरच्या फेऱ्या झाल्या कमी

-साहेबराव हिवराळे-

औरंगाबाद : यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सातारा-देवळाई परिसरातील भूजल पातळी वाढली असून, या परिसरात सध्या अवघ्या २५ फुटांवर बोरवेलला पाणी लागत आहे.

या परिसरात उन्हाळ्यामध्ये पाण्याची गंभीर समस्या जाणवते. या परिसरातील नागरिकांना मे महिन्यात ३५० ते ४०० फूट खोल बोअरवेल घ्यावी लागत होती. यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे भूजल पातळी वाढली आहे. त्यामुळे बोअरवेलला २५ फुटापर्यंत लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिक सध्या २५० फुटांपर्यंत बोअरवेल घेत आहेत. दुसरीकडे, सातारा-देवळाई परिसरात यंदा जुलैपासूनच टँकरच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत.

पुनर्भरणाचे महत्त्व कळले

परिसरात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम राबविण्यात आली. परिसरातील मोठ्या घरांच्या छतावरील पावसाचे पाणी वाहून जावू नये म्हणून ते बोअरवेलमध्ये अडविले जात आहे. सातारा-देवळाईतील नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटलेले आहे. त्यामुळे टँकरच्या फेऱ्या कमी झालेल्या आहेत.

- अशोकराव तिनगोटे

२५ फुटापासूनच पाणी

बोअरवेल घेताना शंभर ते दीडदोनशे फुटांपर्यंत फक्त धुराळा उडत होता. आता अवघ्या २५ फुटांवर पाणी लागत आहे. याचाच अर्थ पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली आहे.

- सादीक पटेल, बोअरवेल चालक.

पाणी जपूनच वापरा

या परिसराला १२ महिने टँकरमुक्ती नाही, असा नागरिकांमध्ये तर्क काढला जातो. यंदा गतवर्षीच्या तुलनेत पावसामुळे पाणीपातळी भरमसाठ वाढलेली आहे. त्या पाण्याचा गैरवापर टाळावा. भविष्यात सर्वांसाठी ते फायद्याचे राहील.

- डॉ. प्रशांत अवसरमल

आकडेवारी घेणे सुरू

पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शहरात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. सातारा-देवळाईच्या बाजूला डोंगर असल्याचा फायदा आहे. चार महिन्याला पाणीपातळीची नोंद घेतली जाते. महिनाअखेर विभागाच्या निरीक्षणातून पाणीपातळीचे आकडे समोर येतील.

- बी. एस. मेश्राम, (उप-संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा औरंगाबाद विभाग.)