शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

शेतकºयांच्या पुन्हा बँकेत रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:48 IST

शेतकºयांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेंतर्गत रात्रंदिवस एक करुन लांबलचक रांगेत उभे राहून कर्जमाफीचे अर्ज भरले. अजूनही काही शेतकºयांची या रांगेपासून सुटका होत नाही तोच कर्जमाफीच्या यादीत नावे असलेल्या शेतकºयांना पुन्हा शासन निर्णयाच्या बदलामुळे रांगेत ताटकळत उभे राहून कागदपत्रे बँकेत जमा करावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान की अवमान योजना हेच कळायला मार्ग नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकºयांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेंतर्गत रात्रंदिवस एक करुन लांबलचक रांगेत उभे राहून कर्जमाफीचे अर्ज भरले. अजूनही काही शेतकºयांची या रांगेपासून सुटका होत नाही तोच कर्जमाफीच्या यादीत नावे असलेल्या शेतकºयांना पुन्हा शासन निर्णयाच्या बदलामुळे रांगेत ताटकळत उभे राहून कागदपत्रे बँकेत जमा करावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान की अवमान योजना हेच कळायला मार्ग नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे.शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून हैराण आहेत. एवढेच काय तर शासनाने ठरवून दिलेल्या केंद्रावर रात्री एक ते दीड वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी रांगेत ताटकळत बसत आहेत. यामध्येही रोज मोजक्याच शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरता येते होते. उर्वरितांना दुसºया दिवशी पुन्हा मोठी पायपीट करावी लागली. एवढी पायपीट करुनही शेतकºयांचे कर्ज माफ होईल किंवा नाही याची शाश्वती नाही. तरीही कर्जमाफीसाठी शेतकºयांची कसरत सुरु आहे. विशेष म्हणजे शासनाने कर्जमाफीसाठी एवढे निकष घातले आहेत. ते पूर्ण करता - करताच अर्ज भरण्याची शेवटची तारीख येऊन ठेपली आहे. आता तर जिल्ह्यातील शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन भरणेही पूर्ण झाले नसले तरी आता पुन्हा शासनाने नवीन फतवा काढून शेतकºयांना पेचात पाडले आहे. आॅनलाईन भरलेले कर्जमाफीचे अर्ज, त्याची पावती, तसेच सातबारा, होल्डींग, कर्ज खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड, बचत खात्याची झेरॉक्स, मृत्यू प्रमाणपत्राचा दाखला हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांनी अर्ज भरले होते, असे शेतकरी नुकतेच शांत झाले होते. आता नव[न सूचनांमुळे पुन्हा शेतकºयांची भंबेरी उडाली आहे. त्यामुळे गुरुवारी पहाटे बँकेच्या रांगेत पुन्हा शेतकरी ताटकळत उभे राहिले होते. तर काही वयोवृद्ध शेतकºयांना उभे राहणे शक्य नसल्याने बसून होते. येथील भारतीय स्टेट बँकेत शेतकºयांची अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. त्यामुळे बँकेत इतर व्यवहार बंद करुन शेतकºयांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. १६ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरता येणार आहेत. आता तर सात बारा आणि होल्डींग केवळ दोन दिवसात भरणे होतील का? हा यक्ष प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे. एवढे करुनही कर्ज माफ झाले नाही तर मेहनतीवर पाणी पडेल.