शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
5
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
6
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
7
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
8
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
9
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
10
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
11
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
12
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
13
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
14
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
15
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
16
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
17
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
18
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
19
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
20
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...

शेतकºयांच्या पुन्हा बँकेत रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:48 IST

शेतकºयांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेंतर्गत रात्रंदिवस एक करुन लांबलचक रांगेत उभे राहून कर्जमाफीचे अर्ज भरले. अजूनही काही शेतकºयांची या रांगेपासून सुटका होत नाही तोच कर्जमाफीच्या यादीत नावे असलेल्या शेतकºयांना पुन्हा शासन निर्णयाच्या बदलामुळे रांगेत ताटकळत उभे राहून कागदपत्रे बँकेत जमा करावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान की अवमान योजना हेच कळायला मार्ग नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकºयांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेंतर्गत रात्रंदिवस एक करुन लांबलचक रांगेत उभे राहून कर्जमाफीचे अर्ज भरले. अजूनही काही शेतकºयांची या रांगेपासून सुटका होत नाही तोच कर्जमाफीच्या यादीत नावे असलेल्या शेतकºयांना पुन्हा शासन निर्णयाच्या बदलामुळे रांगेत ताटकळत उभे राहून कागदपत्रे बँकेत जमा करावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान की अवमान योजना हेच कळायला मार्ग नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे.शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून हैराण आहेत. एवढेच काय तर शासनाने ठरवून दिलेल्या केंद्रावर रात्री एक ते दीड वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी रांगेत ताटकळत बसत आहेत. यामध्येही रोज मोजक्याच शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरता येते होते. उर्वरितांना दुसºया दिवशी पुन्हा मोठी पायपीट करावी लागली. एवढी पायपीट करुनही शेतकºयांचे कर्ज माफ होईल किंवा नाही याची शाश्वती नाही. तरीही कर्जमाफीसाठी शेतकºयांची कसरत सुरु आहे. विशेष म्हणजे शासनाने कर्जमाफीसाठी एवढे निकष घातले आहेत. ते पूर्ण करता - करताच अर्ज भरण्याची शेवटची तारीख येऊन ठेपली आहे. आता तर जिल्ह्यातील शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन भरणेही पूर्ण झाले नसले तरी आता पुन्हा शासनाने नवीन फतवा काढून शेतकºयांना पेचात पाडले आहे. आॅनलाईन भरलेले कर्जमाफीचे अर्ज, त्याची पावती, तसेच सातबारा, होल्डींग, कर्ज खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड, बचत खात्याची झेरॉक्स, मृत्यू प्रमाणपत्राचा दाखला हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांनी अर्ज भरले होते, असे शेतकरी नुकतेच शांत झाले होते. आता नव[न सूचनांमुळे पुन्हा शेतकºयांची भंबेरी उडाली आहे. त्यामुळे गुरुवारी पहाटे बँकेच्या रांगेत पुन्हा शेतकरी ताटकळत उभे राहिले होते. तर काही वयोवृद्ध शेतकºयांना उभे राहणे शक्य नसल्याने बसून होते. येथील भारतीय स्टेट बँकेत शेतकºयांची अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. त्यामुळे बँकेत इतर व्यवहार बंद करुन शेतकºयांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. १६ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरता येणार आहेत. आता तर सात बारा आणि होल्डींग केवळ दोन दिवसात भरणे होतील का? हा यक्ष प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे. एवढे करुनही कर्ज माफ झाले नाही तर मेहनतीवर पाणी पडेल.