शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

कष्टाच्या पैशातून रामवाडीत जयंती

By admin | Updated: April 10, 2015 00:27 IST

सुमेध वाघमारे, तेर आंबेडकरी विचार मानणारे अनेकजण स्वत:हून वर्गणी देतात. समाजातील लोकांकडूनही वर्गणी मिळते. मात्र ही रक्कम जयंती उत्सवासाठी कमी पडत असल्याने

सुमेध वाघमारे, तेरआंबेडकरी विचार मानणारे अनेकजण स्वत:हून वर्गणी देतात. समाजातील लोकांकडूनही वर्गणी मिळते. मात्र ही रक्कम जयंती उत्सवासाठी कमी पडत असल्याने तालुक्यातील रामवाडी येथील सुमारे वीस तरुण जयंतीपूर्वी दहा ते पंधरा दिवस मजुरीचे काम करून या रकमेतून जयंती साजरी करण्याचा उपक्रम मागील अनेक वर्षापासून राबवित आहेत. बाबासाहेबांनी आयुष्य वेचून आमचे जीवन घडविले. मग त्यांच्या जयंतीसाठी कोणापुढे कशाला हात पसरायचा? असा या तरुणांचा सवाल आहे. तेरपासून सुमारे पाच किमी अंतरावर रामवाडी गाव आहे. बौद्ध समाजाची येथे सुमारे चाळीस घरे असून, यातील बहुतांश जणांचा उदरनिर्वाह मजुरीवरच होतो. डॉ. आंबेडकर जयंतीसाठी या चाळीस घरातून ठराविक रक्कम जमा करण्यात येत होती. गावातील काहीजण स्वखुशीने वर्गणी देतात. मात्र त्यानंतरही पुरेसे पैसे जमा होत नसल्याने जयंती कशी साजरी करायची? असा प्रश्न होता. यावर विचार सुरू असताना, काही तरुणांनी जयंती उत्सवासाठी आपण ठराविक दिवस मजुरीचे सामूदायिक काम करू, आणि यातून मिळणारी रक्कम जयंती उत्सवासाठी वापरू, असा विचार मांडला. इतरांनीही या कल्पनेला दुजोरा दिल्यानंतर येथील वीस युवकांनी गावातीलच काहींच्या शेतात आठवडाभर काम करून मजुरीतून प्राप्त झालेल्या रक्कमेतून जयंती उत्सव साजरा केला. मागील अनेक वर्षांपासून रामवाडीतील तरुण याच मार्गाने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करतात. जयंती निमित्ताने संपूर्ण वस्तीत विद्युत रोषणाई केली जाते. या बरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यासाठी बार्शी येथून खास रथही मागविला जातो. शाहीरी, पोवाड्यांच्या कार्यक्रमाबरोबरच जिल्ह्यातील विविध मान्यवरांना जयंतीसाठी बोलाविले जाते. तसेच जयंतीनिमित्ताने ग्रामस्थांना स्रेहभोजन देण्याची परंपराही रामवाडीकर आवर्जून पाळतात. २०१० मधील जयंतीची आठवण सांगताना, समितीचे पदाधिकारी म्हणाले की, त्यावेळीही आमच्याकडे पुरेसे नव्हते. मात्र जयंती तर झालीच पाहिजे. त्यामुळे आम्ही गावातील काही जणांच्या शेतातील ज्वारी काढण्याचे गुत्ते घेतले. या गुत्त्यापोटी काही ज्वारी प्राप्त झाली. ही ज्वारी बाजारात विकून त्यातून मिळालेल्या रकमेतून आम्ही मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली. कष्टाच्या पैशातून जयंती साजरी करण्याचा, बाबासाहेबांचे स्मरण करण्याचा आनंद काही औरच असल्याचे या युवकांनी नमूद केले. मिरवणुकीसाठी लेझीम, झांज पथक असते. ग्रामस्थही या आनंदात सहभागी होतात असे त्यांनी सांगितले.