शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

राकाँला आयते कोलीत

By admin | Updated: March 17, 2017 23:58 IST

बीड : गेवराई पंचायत समितीत शिवसेनेचे सहकार्य झुगारून भाजपने सत्ता तर गमावलीच; शिवाय जिल्हा परिषदेत हातातोंडाशी आलेला सत्तेचा घासही राष्ट्रवादीच्या सोयीचा करुन आयते कोलीत दिले आहे.

बीड : गेवराई पंचायत समितीत शिवसेनेचे सहकार्य झुगारून भाजपने सत्ता तर गमावलीच; शिवाय जिल्हा परिषदेत हातातोंडाशी आलेला सत्तेचा घासही राष्ट्रवादीच्या सोयीचा करुन आयते कोलीत दिले आहे. आ. लक्ष्मण पवारांमुळे दुखावलेल्या माजी मंत्री बदामरावांना राष्ट्रवादीने बरोबर हेरले आहे. दुसरीकडे काकू- नाना आघाडीला पंचायत समितीत राष्ट्रवादीने पाठिंबा दिला नाही. मात्र, बारामतीची वाट ‘सेफ’ ठेवण्यासाठी संदीप क्षीरसागरांनी अजित पवारांची भेट घेऊन जि.प. मध्ये अडचणीत असलेल्या राष्ट्रवादीला टेकू देण्याचे संकेत देऊन काकांना पुन्हा शह देण्यासाठी नवा डाव टाकला आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड २१ मार्च रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. शिवसेनेच्या आश्रयाला असलेले माजी मंत्री बदामराव पंडित व काकू- नाना आघाडीच्या माध्यमातून बंड करणारे संदीप क्षीरसागर यांनी गुरुवारी अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. बंद दाराआड नेमकी काय खलबते झाली? याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. बीड पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी थेट प्रदेश कार्यालयाकडून ‘व्हिप’ आणून संदीप क्षीरसागर यांनी आपण राष्ट्रवादीपासून पूर्णपणे वेगळे झालेलो नाही हे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला जि.प. मध्ये सत्ता स्थापनेसाठी सध्या अवघ्या पाच सदस्यांच्या मदतीची निकड आहे. काँग्रेसचे तीन सदस्यांसोबत आघाडीचा निर्णय पूर्वीच झालेला आहे. त्यामुळे केवळ तीन सदस्य कमी पडतात. शिवसेनेचे चार व काकू- नाना आघाडीचे तीन सदस्य असे दोन पर्याय राष्ट्रवादीसमोर आहेत. गेवराई पंचायत समिती निवडणुकीत भाजपने सेनेची मदत घेतली असती तर युती सत्तास्थानी पोहोचली असती; परंतु आ. लक्ष्मण पवार यांनी दोन्ही पंडितांशी तडजोड करणे टाळले. त्यामुळे बदामरावांनी राष्ट्रवादीच्या आ. अमरसिंह पंडित यांची मदत घेऊन पंचायत समितीची सत्ता काबीज केली. शिवाय मतदारसंघात ‘वजन’ कायम असल्याचेही सिद्ध करुन दाखवले आहे. उल्लेखनीय म्हणजे आठवडाभरापूर्वीच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आ. पवार यांनी माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यासोबत युती केली होती. मात्र, या दोघांचाही आ. अमरसिंह पंडितांसमोर निभाव लागला नाही. राष्ट्रवादीतील दुहीचा फायदा उचलत शिवसेना व शिवसंग्रामच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या ‘लाल दिव्या’ला गवसणी घालण्याची चालून आलेल्या संधीपासून भाजप दूर जात आहे. भाजपकडे हक्काचे १९ सदस्य आहेत. शिवसंग्रामचे तीन, सेनेचे चार व एक अपक्ष असे मिळून २७ सदस्यांची गोळाबेरीज होते. आणखी तीन सदस्यांना खेचून भाजपही सत्तेवर दावा करु शकत होता. मात्र, बदामराव पंडित दुरावल्याने भाजपचे पाय खोलात गेले आहेत.