शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा- राजू शेट्टी

By admin | Updated: August 7, 2014 23:37 IST

जालना : शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली़

जालना : संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती झालेली आहे़ निर्सगानेच शेतकऱ्यांवर ही वेळ आणली, त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा़ राजू शेट्टी यांनी केली़येथील मा़ फुलंब्रीकर नाट्यगृहात स्वाभिमानी पक्षाच्या वतीने आयोजित जालना दुष्काळ मागणी परिषदेत ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत, युवक प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, तुकाराम गवळी, जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, सुरेश गवळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमख भास्कर अंबेकर, रासपाचे मराठवाडा प्रमुख ओमप्रकाश चितळकर आदींची उपस्थिती होती़शेट्टी म्हणाले, राजकारण आमचा धंदा नाही. चळवळ म्हणून व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण करत आहोत. आज शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांना समोरे जावे लागत आहे़ शेतकऱ्यांनी उभी केलेली सहकार चळवळ आज शासन मोडीत काढण्यास निघाले आहे़ राज्यातील १५८ साखर कारखाने खाजगी झाले़ एकेकाळी एकही खाजगी कारखाना नव्हता़शेतकऱ्यांसाठी असलेल्या कारखान्याला एकास नऊ प्रमाणे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले़ ते फेडण्याची हमी राज्य सरकारने घेतलेले होती़ मात्र राज्यकर्तेच कारखान्याचे चेअरमन, संचालक झाले. त्यांनी कारखाना लुटला आणि लिलावात काढला़ तो घेणारे ही राज्यकर्तेच.त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यात आम्ही सत्तेवर येताच लिलाव करून विक्री झालेले कारखान्याच्या मालमत्तेची बाजारभावाप्रमाणे तुलना करून त्यात तफावत आढळ्यास संबंधितावर कारवाई करून कारखाने ताब्यात घेवू़ जोपर्यंत आम्ही धोरणात्मक प्रश्नावर मत देत नाही, तोपर्यंत राज्यकर्ते घाबरणार नाही़ वर्षानुवर्ष त्यांची दुकानदारी, घराणेशाही सुरू आहेत़ ती संपविण्यासाठी सर्वांनी महायुतीच्या पाठीशी राहावे असे आवाहन शेट्टी यांनी केले. (प्रतिनिधी)महायुतीकडे ३८ जागा सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करणारआगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे ३८ जागेची मागणी केली असून १५ आॅगस्टपर्यंत त्यावर निर्णय होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा़ राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़जालन्यात गुरूवारी आयोजित दुष्काळ मागणी परिषदेसाठी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते़ शेट्टी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही शिवसेना- भाजप बरोबर युती केली. यात इतर सहा घटक पक्ष असल्याने ही महायुती झाली आणि लोकसभेत मोठे यश मिळविले़ त्याचप्रमाणे महायुती विधानसभेतही यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त करून शेट्टी म्हणाले, जागा वाटपाचा तिढाही सुटणार आहे़ आम्ही स्वाभिमानी पक्षाला ३८ जागा देण्याची मागणी महायुतीकडे केली़ त्यात मराठवाड्यात जालना, भोकर, जिंतूर, पाथरी, भूम परांडा या जागांचा समावेश आहे़ आम्ही जरी ३८ जागांची मागणी केली असली तरी एकूण ६३ जागा लढविण्याची तयारी ठेवली आहे़ मागणी केलेल्या ३८ पैकी ८ जागा या प्रस्थापितांच्या आहेत़ ज्या ठिकाणी कधीच मित्रपक्षाला यश आले नाही़, अशा जागांवर आम्ही लढणार आहे़ लोकसभेत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदी यांना पूर्वीच घोषित केले होते़ महायुती मुख्यमंत्रीपदाचा उमेंदवार जाहीर करणार का ? या प्रश्नावर शेट्टी म्हणाले, ज्या पक्षाचे जास्त सदस्य निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल़ अगोदरच उमेदवार जाहीर करावयाचा असल्यास इतर दोन पक्ष मोठे आहेत़ त्यांनीच याबाबत निर्णय घ्यावा, असेही शेट्टी म्हणाले़...तर सगळीकडे हिरवेगार असतेमराठवाड्यात मोठ्या प्रमाणात राज्यकर्त्यांनी सिंचन घोटाळा केलेला आहे. हा घोटाळा झाला नसता, आणि इमानदारीने धरणे, बंधाऱ्याची कामे झाली असती तर आज सर्वत्र हिरवेगार, असे चित्र दिसले असते. पाणी अडवा पाणि जिरवा सारख्या योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मराठवाडा दुष्काळाच्या छायेत भरडला जात आहे. त्यातच शासनाचे शेतकऱ्यांविरोधी धोरण असल्याचा आरोप केला.