शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

राजा भ्रतहरीनाथ नागपंचमी यात्रोत्सव

By admin | Updated: August 1, 2014 00:24 IST

उद्धव चाटे, गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ येथे श्री राजा भ्रर्तहरीनाथ यांची भस्मसमाधी आहे़

उद्धव चाटे, गंगाखेडतालुक्यातील हरंगुळ येथे श्री राजा भ्रर्तहरीनाथ यांची भस्मसमाधी आहे़ सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असल्यामुळे येथे नागपंचमीनिमित्त भव्य यात्रा महोत्सव आयोजित केला जातो़ या महोत्सवात राज्यासह परराज्यातून लाखो भाविकांची उपस्थिती असते़ १ आॅगस्ट रोजी नागपंचमी सणानिमित्त हरंगुळ येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा महोत्सव भरविला जातो़ नागपंचमीनिमित्त यात्रा महोत्सवाचे मोठे धार्मिक महत्त्व आहे़ नाथ संप्रदायातील नऊ नाथांपैकी एक राजा भ्रर्तहरीनाथ महाराज यांची हरंगुळ येथे वस्त्र व भस्म समाधी आहे़ नागपंचमीच्या दिवशी या समाधीला वारूळ पडते व राजा भ्रर्तहरीनाथ नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक वर्षी साप रुपाने भक्तांना दर्शन देण्याकरीता येतात, अशी अख्यायिका आहे़ त्यांचा अवतार राजा विक्रमादित्य समकालीन आहे़ राजा विक्रमादित्यांनी त्यांना भाऊ समजून राज्यभार दिला म्हणून श्री भ्रर्तहरीनाथांना राजा ही उपाधी प्राप्त झाली़ बरीच वर्षे राज्य केल्यानंतर राज वैभवाचा त्याग करून नाथ संप्रदायाच्या प्रचार व लोककल्याणासाठी तप, तपस्या, तीर्थाटन केले़ तीर्थाटन करीत असताना शेवटी ते गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ येथे आले व बरीच वर्षे वास्तव्य केल्यानंतर भक्तांना आपल्या अंगावरचे वस्त्र काढून दिले व या गावात समाधी तयार करा, असे सांगितले़ प्रत्येक वर्षी मी पाताळातून साप रुपाने येऊन तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी दर्शन देईल, असे सांगून ते पाताळात निघून गेले़ त्याप्रमाणे आजही हरंगुळ येथे नागपंचमीच्या दिवशी समाधीला वारुळ पाडून ते भक्तांना दर्शन देतात, अशी या मागची अख्यायिका आहे़ पर्यटनस्थळाकडे दुर्लक्ष हरंगुळ येथे श्री राजा भ्रर्तहरीनाथाची समाधी आहे़ त्यामुळे या गावाला पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे़ परंतु, याकडे दुर्लक्ष असल्याने भक्तांसाठी सोयी, सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे़ शासनाने सोयी, सुविधा द्याव्यात, अशी प्रतिक्रिया नारायण शिंदे, बाळासाहेब कुलकर्णी, बालासाहेब देशमुख, प्रकाश कुलकर्णी, लक्ष्मीकांत जोशी यांनी दिल्या़ नवसाला पावणारे, चमत्कार दाखविणारे कडू लिंबाच्या पानालाही गोड चव देणारे, माती, वाळूची क्षमताही विषारी सापाला दूर ठेऊ शकणारे श्री क्षेत्र हरंगुळ येथे राजा भ्रर्तहरीनाथ यांचे भव्य मंदिर आहे़ श्री राजा भ्रर्तहरीनाथांनी मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी तपस्या करून शके १७१० मध्ये हरंगुळ येथे आले होते असे सांगितले जाते़ अनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर ते गुप्त झाले म्हणून येथे नाथाची भस्म समाधी आहे़ या समाधीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीसह इतर राज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात़