शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

राज ठाकरे यांच्याविरुद्धचे ‘ते’ दोषारोपपत्र रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:40 IST

परप्रांतीयांना राज्यातून हकालण्यासाठी चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात महाराष्ट Ñनवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. एल. वडणे यांनी सोमवारी (दि.३) रद्द केले.

ठळक मुद्देचिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रकरण

औरंगाबाद : परप्रांतीयांना राज्यातून हकालण्यासाठी चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात महाराष्ट Ñनवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. एल. वडणे यांनी सोमवारी (दि.३) रद्द केले.मनसेने २००८ साली परप्रांतीयांना राज्यातून हकालण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर २१ आॅक्टोबर २००८ रोजी औरंगाबाद- राजूर बस औरंगाबादकडे येत असताना बदनापूरमध्ये १० ते १५ लोकांनी ‘राज ठाकरे जिंदाबाद’अशा घोषणा देत बसवर दगडफेक केली. ‘राज ठाकरे यांचा विजय असो, परप्रांतीयांना राज्यातून हाकला’ असा आदेश राज ठाकरे यांनी दिल्याच्या घोषणा दिल्या. याविरुद्ध बसचालक अंबादास तेलंगरे यांनी त्याच दिवशी बदनापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राज ठाकरे यांच्यासह १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरोधात भादंवि कलम ३३६, १४३, १०९, ११४, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, तसेच मुंबई पोलीस कायद्याचे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी ३० जानेवारी २००९ रोजी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र बदनापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले. खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेसह इतर आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. राज ठाकरे यांच्या वतीने अ‍ॅड. सागर सोमनाथ लड्डा यांनी ठाकरे यांना दोषमुक्त करण्याबाबत अर्ज दिला. मात्र ते प्रत्यक्ष हजर होत नाहीत, तोपर्यंत अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने तोंडी नकार दिला.ठाकरे यांनी त्यांच्याविरुद्धचे दोषारोपपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. सुरुवातीस २००९ साली खंडपीठाने दोषारोपपत्रास अंतरिम स्थगिती दिली होती.याचिकेवर सोमवारी अंतिम सुनावणी झाली असता अ‍ॅड. लड्डा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, २१ आॅक्टोबर २००८ रोजी बदनापूरमधील कथित घटनेच्या दिवशी राज ठाकरे यांना मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांचा बदनापूरमधील घटनेत सहभाग नाही. अनोळखी व्यक्ती कोण होत्या त्यांच्याशी राज ठाकरे यांचा संबंध नाही. तसेच चिथावणीखोर भाषण दिल्याचा कुठलाही सबळ पुरावा अभियोग पक्ष न्यायालयात सादर करू शकला नाही, ही बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. सुनावणीअंती खंडपीठाने वरील आदेश दिला. या प्रकरणात अ‍ॅड. सागर लड्डा यांना अ‍ॅड. सत्यजित रहाटे, अंकित साबू , सन्नी खिंवसरा आणि गुलशन मुंदडा यांनी सहकार्य केले.-------------

टॅग्स :Courtन्यायालयRaj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबाद