शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

आंबेडकरांचे स्मारक उभारणार

By admin | Updated: August 15, 2014 01:37 IST

कळंब : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आधारित लोकशाही चौकट बनविण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच

कळंब : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आधारित लोकशाही चौकट बनविण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच वाटचाल करण्याची आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. जिल्ह्यातील कसबे-तडवळे येथे बाबासाहेबांचा पावनस्पर्श झाला आहे. त्यामुळे तेथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणाही यावेळी चव्हाण यांनी केली.कळंब नगर परिषदेच्या वतीने शहरातील पं. जवाहरलाल नेहरू बालोद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र भिख्खू संघाचे उपाध्यक्ष भंत्ते उपगुप्त महाथेरो, आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, पं.स. सभापती छायाताई वाघमारे, उपसभापती लक्ष्मण आडसूळ, नगराध्यक्ष मिराताई चोंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, माजी आमदार दयानंद गायकवाड, यशपाल सरवदे, दगडू धावारे, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, डॉ सुनील गायकवाड, ब्रिजलाल मोदाणी, जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे, विश्वास शिंदे, लक्ष्मण सरडे, आप्पासाहेब शेळके, भागवत धस, पांडुरंग कुंभार, शिल्पकार निरंजन मडिलगेकर आदींची उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची चौकट बळकट करण्याचे कार्य राज्यघटनेच्या माध्यमातून केले. सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांना समान संधी देणारे ‘एक व्यक्ती, एक मत’ हे धोरण त्यांनी अवलंबिले. सर्वसामांन्या केंद्रबिंद मानून त्यांनी काम केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश त्यांनी दिला. या महामानवाचा पुतळा उभा करून कळंब नगर परिषदेने शहरवासियांची मागील पंचेवीस वर्षांची मागणी पूर्ण केली आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळत राहिल, असा विश्वास पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)