शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आंबेडकरांचे स्मारक उभारणार

By admin | Updated: August 15, 2014 01:37 IST

कळंब : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आधारित लोकशाही चौकट बनविण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच

कळंब : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आधारित लोकशाही चौकट बनविण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच वाटचाल करण्याची आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. जिल्ह्यातील कसबे-तडवळे येथे बाबासाहेबांचा पावनस्पर्श झाला आहे. त्यामुळे तेथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणाही यावेळी चव्हाण यांनी केली.कळंब नगर परिषदेच्या वतीने शहरातील पं. जवाहरलाल नेहरू बालोद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र भिख्खू संघाचे उपाध्यक्ष भंत्ते उपगुप्त महाथेरो, आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, पं.स. सभापती छायाताई वाघमारे, उपसभापती लक्ष्मण आडसूळ, नगराध्यक्ष मिराताई चोंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, माजी आमदार दयानंद गायकवाड, यशपाल सरवदे, दगडू धावारे, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, डॉ सुनील गायकवाड, ब्रिजलाल मोदाणी, जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे, विश्वास शिंदे, लक्ष्मण सरडे, आप्पासाहेब शेळके, भागवत धस, पांडुरंग कुंभार, शिल्पकार निरंजन मडिलगेकर आदींची उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची चौकट बळकट करण्याचे कार्य राज्यघटनेच्या माध्यमातून केले. सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांना समान संधी देणारे ‘एक व्यक्ती, एक मत’ हे धोरण त्यांनी अवलंबिले. सर्वसामांन्या केंद्रबिंद मानून त्यांनी काम केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश त्यांनी दिला. या महामानवाचा पुतळा उभा करून कळंब नगर परिषदेने शहरवासियांची मागील पंचेवीस वर्षांची मागणी पूर्ण केली आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळत राहिल, असा विश्वास पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)